शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक ...

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक प्रवास सुरू असल्याचे नागपूर विभागात चित्र आहे.

नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. त्यातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा आणि वर्धमाननगर हे चार आगार शहरात असून सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. यापैकी उमरेड आणि इमामवाडा या दोन आगारामधून सध्या एकही बस सुटत नाही. काटोल आणि गणेशपेठ या दोन आगारावरून सध्याच्या दिवसातही बसेस सोडल्या जात असल्या तरी सेवा मात्र मर्यादित आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी महामंडळाची प्रवासीसेवा सध्या सुरू आहे. प्रवाशांकडून कारण समजून घेतल्यावरच प्रवास करू दिला जात असून, सरकारी कर्मचारी वगळता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यामुळे अनावश्यक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवर आपोआपच मर्यादा आली आहे.

नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज तीन हजारावर व्यक्ती प्रवास करायचे. आता ही संख्या एकदम कमी होऊन सरासरी ६०० ते ७०० वर आली आहे. बसेसच्या फेऱ्याही कमी झाल्या असून, नागपूर विभागातून १० ते १२ बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. एका आगारातून जेमतेम एक ते दोन बसेस सुटत आहेत. मात्र गणेशपेठ मध्यवर्ती आगारातून रोज २५ ते ३० बसेसची ये-जा सुरू असून, जवळपास ८०० ते एक हजार व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती आहे.

...

वर्धा, काटोल मार्गावर गर्दी अधिक

या दिवसात प्रवाशांची गर्दी फारच घटली आहे. असे असले तरीही वर्धा आणि काटोल या मार्गावर त्यातल्यात्यात अधिक प्रवासी असतात. वर्धा मार्गावर एमआयडीसी असल्याने काम आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काटोल मार्गावरील ग्रामीण भागातून शहरात अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांसोबतच रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या या मार्गावरही अधिक आहे.

...

कर्मचाऱ्यांसोबत वादाचे किरकोळ प्रसंग

एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांकडून वाद घालण्याचे प्रसंग किरकोळ घडत आहेत. प्रवासासाठी परवानगी नसणे, शिक्का मारून घेणे या कारणावरून वाद अधिक आहेत. मात्र प्रत्येक बसस्थानकावर आणि आगारात प्रवाशांसाठी यासंदर्भात फलकावर सूचना लावण्यात आल्याने हे वाद लवकरच शमतातही. प्रवासी पासवरून वाद कमी होत आहे. कर्मचारी त्यांच्या शासकीय कार्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवीत असेल तर प्रवासाला परवानगी दिली जात असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

...