शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक ...

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक प्रवास सुरू असल्याचे नागपूर विभागात चित्र आहे.

नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. त्यातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा आणि वर्धमाननगर हे चार आगार शहरात असून सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. यापैकी उमरेड आणि इमामवाडा या दोन आगारामधून सध्या एकही बस सुटत नाही. काटोल आणि गणेशपेठ या दोन आगारावरून सध्याच्या दिवसातही बसेस सोडल्या जात असल्या तरी सेवा मात्र मर्यादित आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी महामंडळाची प्रवासीसेवा सध्या सुरू आहे. प्रवाशांकडून कारण समजून घेतल्यावरच प्रवास करू दिला जात असून, सरकारी कर्मचारी वगळता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यामुळे अनावश्यक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवर आपोआपच मर्यादा आली आहे.

नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज तीन हजारावर व्यक्ती प्रवास करायचे. आता ही संख्या एकदम कमी होऊन सरासरी ६०० ते ७०० वर आली आहे. बसेसच्या फेऱ्याही कमी झाल्या असून, नागपूर विभागातून १० ते १२ बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. एका आगारातून जेमतेम एक ते दोन बसेस सुटत आहेत. मात्र गणेशपेठ मध्यवर्ती आगारातून रोज २५ ते ३० बसेसची ये-जा सुरू असून, जवळपास ८०० ते एक हजार व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती आहे.

...

वर्धा, काटोल मार्गावर गर्दी अधिक

या दिवसात प्रवाशांची गर्दी फारच घटली आहे. असे असले तरीही वर्धा आणि काटोल या मार्गावर त्यातल्यात्यात अधिक प्रवासी असतात. वर्धा मार्गावर एमआयडीसी असल्याने काम आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काटोल मार्गावरील ग्रामीण भागातून शहरात अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांसोबतच रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या या मार्गावरही अधिक आहे.

...

कर्मचाऱ्यांसोबत वादाचे किरकोळ प्रसंग

एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांकडून वाद घालण्याचे प्रसंग किरकोळ घडत आहेत. प्रवासासाठी परवानगी नसणे, शिक्का मारून घेणे या कारणावरून वाद अधिक आहेत. मात्र प्रत्येक बसस्थानकावर आणि आगारात प्रवाशांसाठी यासंदर्भात फलकावर सूचना लावण्यात आल्याने हे वाद लवकरच शमतातही. प्रवासी पासवरून वाद कमी होत आहे. कर्मचारी त्यांच्या शासकीय कार्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवीत असेल तर प्रवासाला परवानगी दिली जात असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

...