शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक ...

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक प्रवास सुरू असल्याचे नागपूर विभागात चित्र आहे.

नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. त्यातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा आणि वर्धमाननगर हे चार आगार शहरात असून सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. यापैकी उमरेड आणि इमामवाडा या दोन आगारामधून सध्या एकही बस सुटत नाही. काटोल आणि गणेशपेठ या दोन आगारावरून सध्याच्या दिवसातही बसेस सोडल्या जात असल्या तरी सेवा मात्र मर्यादित आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी महामंडळाची प्रवासीसेवा सध्या सुरू आहे. प्रवाशांकडून कारण समजून घेतल्यावरच प्रवास करू दिला जात असून, सरकारी कर्मचारी वगळता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यामुळे अनावश्यक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवर आपोआपच मर्यादा आली आहे.

नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज तीन हजारावर व्यक्ती प्रवास करायचे. आता ही संख्या एकदम कमी होऊन सरासरी ६०० ते ७०० वर आली आहे. बसेसच्या फेऱ्याही कमी झाल्या असून, नागपूर विभागातून १० ते १२ बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. एका आगारातून जेमतेम एक ते दोन बसेस सुटत आहेत. मात्र गणेशपेठ मध्यवर्ती आगारातून रोज २५ ते ३० बसेसची ये-जा सुरू असून, जवळपास ८०० ते एक हजार व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती आहे.

...

वर्धा, काटोल मार्गावर गर्दी अधिक

या दिवसात प्रवाशांची गर्दी फारच घटली आहे. असे असले तरीही वर्धा आणि काटोल या मार्गावर त्यातल्यात्यात अधिक प्रवासी असतात. वर्धा मार्गावर एमआयडीसी असल्याने काम आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काटोल मार्गावरील ग्रामीण भागातून शहरात अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांसोबतच रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या या मार्गावरही अधिक आहे.

...

कर्मचाऱ्यांसोबत वादाचे किरकोळ प्रसंग

एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांकडून वाद घालण्याचे प्रसंग किरकोळ घडत आहेत. प्रवासासाठी परवानगी नसणे, शिक्का मारून घेणे या कारणावरून वाद अधिक आहेत. मात्र प्रत्येक बसस्थानकावर आणि आगारात प्रवाशांसाठी यासंदर्भात फलकावर सूचना लावण्यात आल्याने हे वाद लवकरच शमतातही. प्रवासी पासवरून वाद कमी होत आहे. कर्मचारी त्यांच्या शासकीय कार्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवीत असेल तर प्रवासाला परवानगी दिली जात असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

...