शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

एसटी प्रवासासाठी आजारपण, अंत्यविधीचीच कारणे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक ...

नागपूर : सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एसटी प्रवासावरही मर्यादा आणल्या आहेत. महामंडळाच्या एसटीमधून आजारपण आणि अंत्यसंस्काराच्या कारणासाठीच अधिक प्रवास सुरू असल्याचे नागपूर विभागात चित्र आहे.

नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. त्यातील गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा आणि वर्धमाननगर हे चार आगार शहरात असून सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेक हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. यापैकी उमरेड आणि इमामवाडा या दोन आगारामधून सध्या एकही बस सुटत नाही. काटोल आणि गणेशपेठ या दोन आगारावरून सध्याच्या दिवसातही बसेस सोडल्या जात असल्या तरी सेवा मात्र मर्यादित आहे.

अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी महामंडळाची प्रवासीसेवा सध्या सुरू आहे. प्रवाशांकडून कारण समजून घेतल्यावरच प्रवास करू दिला जात असून, सरकारी कर्मचारी वगळता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यामुळे अनावश्यक प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवर आपोआपच मर्यादा आली आहे.

नागपूर विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज तीन हजारावर व्यक्ती प्रवास करायचे. आता ही संख्या एकदम कमी होऊन सरासरी ६०० ते ७०० वर आली आहे. बसेसच्या फेऱ्याही कमी झाल्या असून, नागपूर विभागातून १० ते १२ बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. एका आगारातून जेमतेम एक ते दोन बसेस सुटत आहेत. मात्र गणेशपेठ मध्यवर्ती आगारातून रोज २५ ते ३० बसेसची ये-जा सुरू असून, जवळपास ८०० ते एक हजार व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती आहे.

...

वर्धा, काटोल मार्गावर गर्दी अधिक

या दिवसात प्रवाशांची गर्दी फारच घटली आहे. असे असले तरीही वर्धा आणि काटोल या मार्गावर त्यातल्यात्यात अधिक प्रवासी असतात. वर्धा मार्गावर एमआयडीसी असल्याने काम आणि रोजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काटोल मार्गावरील ग्रामीण भागातून शहरात अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांसोबतच रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या या मार्गावरही अधिक आहे.

...

कर्मचाऱ्यांसोबत वादाचे किरकोळ प्रसंग

एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांकडून वाद घालण्याचे प्रसंग किरकोळ घडत आहेत. प्रवासासाठी परवानगी नसणे, शिक्का मारून घेणे या कारणावरून वाद अधिक आहेत. मात्र प्रत्येक बसस्थानकावर आणि आगारात प्रवाशांसाठी यासंदर्भात फलकावर सूचना लावण्यात आल्याने हे वाद लवकरच शमतातही. प्रवासी पासवरून वाद कमी होत आहे. कर्मचारी त्यांच्या शासकीय कार्यालयाचे पत्र किंवा ओळखपत्र दाखवीत असेल तर प्रवासाला परवानगी दिली जात असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

...