शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

नागपुरातील सरस्वती शाळेच्या १३ शिक्षकांना अवैध मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:42 IST

सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : सरकारचे तीन कोटी रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.सरस्वती शाळेला २०१०-११ मध्ये २० टक्के अनुदान मिळाले होते. २०१४-१५ मध्ये या शाळेला १०० टक्के अनुदान देण्यात आले. २०१६ मध्ये शाळेत १८ शिक्षक कार्यरत होते. त्या शिक्षकांच्या नियुक्त्या अवैधपणे झाल्याचा आरोप होता. उपशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी २८ मार्च २०१६ रोजी १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांची मान्यता रद्द केली. असे असताना जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मागच्या तारखेमध्ये जाऊन, म्हणजे १६ नोव्हेंबर २०१५ रोजी समान आदेशाद्वारे मान्यता प्रदान केली. तसेच, या शिक्षकांना त्यांच्या वेतनाची थकबाकी उचलण्याची अनुमती देण्यात आली. या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले असतानाही कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून या शिक्षकांचे वेतन तात्काळ थांबविण्यास सांगितले होते. त्या आदेशाचेदेखील पालन करण्यात आले नाही. परिणामी, आतापर्यंत सरकारचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिक्षकांना आताही नियमित वेतन दिले जात आहे, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, ही याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षकांचे वेतन थांबविण्यात यावे, शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधपणे मान्यता प्रदान करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला व्यक्तीश: जबाबदार धरण्यात यावे, दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.सरकार व इतरांना नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना नोटीस बजावून ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अमित भाटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक