शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

नागपुरातील सरस्वती शाळेच्या १३ शिक्षकांना अवैध मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:42 IST

सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : सरकारचे तीन कोटी रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून कामठी येथील सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळेच्या १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधरीत्या मान्यता प्रदान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, यामुळे राज्य सरकारचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.सरस्वती शाळेला २०१०-११ मध्ये २० टक्के अनुदान मिळाले होते. २०१४-१५ मध्ये या शाळेला १०० टक्के अनुदान देण्यात आले. २०१६ मध्ये शाळेत १८ शिक्षक कार्यरत होते. त्या शिक्षकांच्या नियुक्त्या अवैधपणे झाल्याचा आरोप होता. उपशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी २८ मार्च २०१६ रोजी १३ शिक्षकांच्या नियुक्त्यांची मान्यता रद्द केली. असे असताना जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी या शिक्षकांच्या नियुक्त्यांना मागच्या तारखेमध्ये जाऊन, म्हणजे १६ नोव्हेंबर २०१५ रोजी समान आदेशाद्वारे मान्यता प्रदान केली. तसेच, या शिक्षकांना त्यांच्या वेतनाची थकबाकी उचलण्याची अनुमती देण्यात आली. या शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले असतानाही कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून या शिक्षकांचे वेतन तात्काळ थांबविण्यास सांगितले होते. त्या आदेशाचेदेखील पालन करण्यात आले नाही. परिणामी, आतापर्यंत सरकारचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शिक्षकांना आताही नियमित वेतन दिले जात आहे, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, ही याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षकांचे वेतन थांबविण्यात यावे, शिक्षकांच्या नियुक्त्यांना अवैधपणे मान्यता प्रदान करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याला व्यक्तीश: जबाबदार धरण्यात यावे, दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.सरकार व इतरांना नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना नोटीस बजावून ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अमित भाटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक