शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

विनाकारण फिराल तर पोलीस ठाण्यात जाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:36 IST

: सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

ठळक मुद्देरिकामटेकड्यांची आता खैर नाहीदंडुकेही मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ती अधिक वाढू नये म्हणून पोलीस नागरिकांना त्यांच्या घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनाला दाद मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी हात जोडून विनंती केली आहे. काही ठिकाणी फूल देऊन तर काही ठिकाणी चक्क हार घालून पोलिसांनी गांधीगिरी सुरू केली आहे. या माध्यमातून शहरात विनाकारण इकडे-तिकडे फिरणाऱ्याना रोखण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. गस्तीवरील पथकांच्या माध्यमातून लाऊड स्पीकरवरून कडक कारवाईचा इशारा दिला जात आहे. मात्र अजूनही रिकामटेकडे पोलिसांना दाद देत नाहीत. त्यांना कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप लक्षात आला नाही की काय म्हणून ते विनाकारण इकडेतिकडे फिरत आहेत. भर उन्हात इकडून तिकडे फिरणाऱ्यांमध्ये केवळ तरुण आणि प्रौढच नव्हे तर महिला आणि तरुणींचाही समावेश आहे. त्याही बिनधास्त इकडेतिकडे फिरताना आढळत आहेत. त्यामुळे या सर्वांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता आपली कार्यपद्धत बदललेली आहे. आता अशा रिकामटेकड्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन त्यांची वाहने जप्त करण्यासोबतच त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रयोग पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रयोगाचा रिकामटेकड्या मंडळीवर कसा प्रभाव पडतो, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.जरीपटक्यात हार घालून स्वागतपोलिसांच्या आवाहनाला आणि कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता रस्त्याने फिरणाऱ्या अनेकांना बुधवारी जरीपटका पोलिसांनी हार घातले. वाहनचालकांचे वाहन रस्त्याच्या बाजूला नेऊन पोलिसांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना आता तरी कोरोनाचा धोका लक्षात घ्या, अशी विनंती केली. त्यांच्या हातात चालान ठेवले आणि आताही नाही मानलात तर यापुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस