शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सन्मान होत नसेल तर मार्ग मोकळा : रामदास आठवलेंचा भाजपला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:49 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.

ठळक मुद्देयुतीसंदर्भात २५ ला कार्यकर्त्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. जागा वाटपही जाहीर केले. परंतु यात मिंत्र पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपाइंसाठी मात्र एकही जागा सोडली नाही किंवा त्यांना साधी विचारणाही केली नाही. यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कमालीचे नाराज असून त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपला संताप जाहीरपणे व्यक्त केला. नागपुरात सुरु असलेल्या नाट्य संमेलनासाठी ते आले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप-शिवसेना युती व्हावी, अशी आपली सुरुवतीपासूनच इच्छा होती. ती झाली त्याचा आनंद आहे. परंतु आम्हाला साधी विचारणाही केली नाही, हे बरोबर नाही. लोकसभेमध्ये आम्हाला किमान एक जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मी स्वत: दक्षिण-मध्य मुंबई येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. देशभरातील कार्यकर्ते व लोक मला विचारत आहेत. त्यांना काय उत्तर देणार, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी उपरोक्त इशारा दिला. शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, मी शरद पवार यांची भेट घेतली नाही. भेट घ्याचीच झाली तर उघडपणे घेणार. छगन भुजबळ यांनी आपल्याला भेटण्याबाबत विचारणा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे, विनोद थुल, सतीश तांबे आदी उपस्थित होते.पाकिस्तानसोबत आरपारची लढाई व्हावीचपाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे. त्याच्याशी एकदा आरपारची लढाई झालीच पाहिजे. नितीन गडकरी यांनी पाकिस्तानाचे पाणी अडवले, त्याचे स्वागत करीत केवळ पाणीच नव्हे तर पाकिस्तानसोबतचे क्रिकेटही बंद झाले पाहिजे. सैन्य दलात आरक्षण लागू करण्यात यावे, अशी आपल्या पक्षाची मागणी आहे. दलित युवकांनीही सैन्यात भर्ती व्हावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण