शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:33 IST

शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.

ठळक मुद्दे१५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द१ लाख ३ हजार ९४१ वाहनचालकांना चालान तामील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी गत १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. त्यात ही माहिती देण्यात आली. इतिवृत्तातील अन्य माहितीनुसार, न्यायालयाने वाहतूक सिग्नल व वाहतूक पोलिसांच्या वेतनाचा खर्च वाहतूक नियम तोडणाºयांवर अतिरिक्त दंड आकारून वसूल करता येऊ शकतो का, अशी विचारणा केली होती. त्यानुसार, सरकारला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील ७०० चौकांत ३,९१२ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे प्रस्तावित असून, त्यापैकी ३,६८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या ३०४ कॅमेरे विविध कारणांमुळे काढण्यात आले आहेत किंवा बंद आहेत. भरारी पथकाने शाळा-महाविद्यालयात जाऊन ६१४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ३ लाख २२ हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेने पार्किंग व्यवस्था नसलेल्या ६५ शिकवणी वर्ग संचालकांना नोटीस बजावली.शहरात ४५७ गोठ्यांकडे परवाने असून, ५८९ गोठे विनापरवाना सुरू आहेत. आतापर्यंत ७९४ जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरण व जनावरांचे टॅगिंग न करणाºया ३५ गोठ्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने मोकाट जनावरांच्या ३० मालकांवर कारवाई केली आहे. मोरभवन येथून सध्या राज्य परिवहन महामंडळ व मनपा बसेसच्या १५०० वर फे ºया होतात. अशा परिस्थितीत चंद्रपूर, वर्धा, अमरावती व काटोल मार्गाच्या बसेस सुरू केल्यास १००० फे ºया वाढून वाहतूककोंडी होईल, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा सादरगोठे शहराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा नगर रचना विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प १९.३९ हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. प्रकल्पात १० जनावरांसाठी १ याप्रमाणे ४६८ गोठे बांधले जाणार आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtraffic policeवाहतूक पोलीस