शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 6, 2024 17:10 IST

Nagpur : "महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल"

कमलेश वानखेडे, नागपूर नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात आता भांडणे होऊ लागली आहेत. या भांडणांचा आवाज आता बाहेरही येऊ लागला आहे. असे असेल तर त्यांनी आता कॅबीनेट घेऊ नये, नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांना ठोकतील, असा खोचक सल्ला विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अलीकडील घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचे धिंढवडे निघाले आहेत. गुन्हेगाराची हिंमत वाढली आहे. राजकारणासाठी जीवन उद्धवस्त होत आहे. बदलापूरातील गोळीबार घटना त्याच प्रतीक आहे. बार्टी, आर्टीचे विदर्भात ट्रेनिंग सेंटर नाही. विदर्भातील मुलाना पुणे येथे जावे लागेल. याचे प्रशिक्षण केंद्र नागपुरात उघडले गेले पाहिजे. ही मागणी करणारे पत्र आपण सरकारला देऊ. गरज पडल्यास मी आंदोलन करणार, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. कमिशनखोर सरकारला घालविण्यासाठी आम्ही एकसंघ आहोत. महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार