शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत न्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 20:24 IST

Nagpur News मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत नेण्याचे उपक्रम राबवा, असे आवाहन राज्यस्तरीय पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनात एकनाथ आव्हाड यांचे आवाहन

नागपूर : खरे तर विद्यार्थिदशेपासून हातात पुस्तक असायला हवे. ज्याच्या हातात पुस्तक असते त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. मुले पुस्तकांपर्यंत जात नसतील तर पुस्तके मुलांपर्यंत नेण्याचे उपक्रम राबवा, असे आवाहन राज्यस्तरीय पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी केले.

आकांक्षा प्रकाशनाच्या वतीने रविवारी रेशीमबाग येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सभागृहात हे एकदिवसीय संमेलन झाले. ‘आजचा बालक-उद्याचा भारत’ ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती. उद्घाटन बालसाहित्यिक उर्वी खडके हिच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर, स्वागताध्यक्ष प्रा. अरुण पवार, प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, मुख्य आयोजक डॉ. अरुणा सबाने, आमंत्रक डॉ. मंजूषा सावरकर उपस्थित होत्या.

आव्हाड पुढे म्हणाले, पालकांनी मुलांना पुस्तके आणून द्यावी, स्वत:ही वाचावी. पालकांच्या हातात पुस्तक दिसले तर मुलेही अनुकरणातून ती वाचायला लागतील. माणूस जोडण्याचे सुंदर काम पुस्तक करतात. त्यामुळे पुस्तकांना मित्र करा. कारण वाचनातूनच विचार दिले जातात.

साहित्य ही जादूची छडी : उर्वी खकडे

उद्घाटनपर भाषणात उर्वी खडके म्हणाली, साहित्य ही जादूची छडी आहे. ती बालपणीच हाती आली तर आयुष्यच बदलून जाते. हॅरी पॉटरसारखे साहित्य लहानांसोबत मोठ्यांनाही आवडत असले तरी तसे साहित्य आपल्याकडे का निर्मिले जाऊ नये, अशी खंतही तिने व्यक्त केली. विज्ञानाने जग सुखाचे होत असेल तर कलेने ते अधिक सुंदर होते, असे सांगून उर्वीने महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. कला शाखेत शिकण्यासारखे बरेच काही असतानाही केवळ पैसा कमावता येणार म्हणून अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याच्या नादात या शाखेला कमी लेखले जाते. मुलांवर अपेक्षांचे ओझे कमी लादा, नाहीतर ते कोलमडून पडतील, असे भावनिक आवाहनही उर्वीने केले.

घराघरांतील पालक आणि पाल्यांमधील संवाद हरविल्याची खंत तिने व्यक्त केली. यामुळे मुले एकटी पडतात, हे टाळायचे असेल तर पालकांनी नोकरी सांभाळून पाल्यांना वेळ द्यावा, कारण संवादातून नाते घट्ट होते, असे मत व्यक्त केले.

 

स्वागताध्यक्ष अरुण पवार यांनी साहित्याचा वसा व वारसा पुढे नेणारे वारकरी असा बालसाहित्यिकांचा उल्लेख केला. विदर्भाच्या सांस्कृतिक श्रीमंतीबद्दलही माहिती दिली. डॉ. मंजूषा सावरकर यांनी स्वागतपर भाषणातून संमेलनामागील उद्देश सांगितला. तर अरुणा सबाने यांनी बालसाहित्याची पार्श्वभूमी सांगताना साहित्याला जवळ करतो तेव्हाच माणूस परिपक्व होतो, अशी साहित्याची महती प्रास्ताविकातून सांगितली. डॉ. अनुजा नन्नावरे आणि स्वरा सोहनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नीलेश सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. लीना निकम, डॉ. सोनाली हिंगे, दिनेश मासोदकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

 

ग्रंथदिंडीने प्रारंभ

सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशातील विद्यार्थी लेझीमच्या तालावर नाचत होते. कार्यक्रमादरम्यान एकनाथ आव्हाड यांच्या ‘खळाळता अवखळ झरा’ या पुस्तकाचे प्रकाशन लीला शिंदे यांच्या हस्ते तर डॉ. वसुधा वैद्य यांच्या ‘गम्माडी गंमत’ या पुस्तकाचे प्रकाशन आव्हाड यांनी केले.

.....

टॅग्स :literatureसाहित्य