शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:49 IST

भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

ठळक मुद्देह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.सद्गुरू श्री धुंडामहाराज व मातोश्री कृष्णामाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पाचव्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी हभप श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, श्री क्षेत्र पंढरपूर यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातील अभंगावर विस्तृत विवेचन केले. सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या प्रवचनमालेचे आयोजन एकनाथ चौधरी व मंदा चौधरी परिवारातर्फे करण्यात आले आहे. दुसºया दिवशी प्रवचनमालेच्या सुरुवातीला रूपाली व सचिन बक्षी यांनी अभंग गायले. प्रवचनाच्या सुरुवातीला महाराज म्हणाले की, हरीपाठ ज्ञानेश्वर महाराजांची विशेष रचना आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी हरीपाठ मांडला आहे. हरीपाठाला उपासनेचे आणि अभ्यासाचे मूल्य आहे. हरीपाठ ऐकताना त्यातून प्रकट झालेले प्रमेय, सद्उपदेश, वाच्यार्थ, लक्षार्थ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी त्यांनी हरीपाठातील पहिल्या अभंगाच्या ओवीचा विस्तृत पाठ मांडला. देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया..., महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीतून मोक्षप्राप्तीचा ध्यास मानवाला दिला आहे. पण अनेकांना मोक्षच माहिती नाही. ते म्हणतात की दु:खाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. महाराज म्हणाले की मोक्ष प्राप्तीसाठी देवाचिया दारी क्षणभर उभे राहा. पण उभे राहताना शरीरानेच नाही तर मनात, चिंतनात आणि स्मरणात त्या भगवंताला ठेवा. तरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक