शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:49 IST

भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

ठळक मुद्देह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.सद्गुरू श्री धुंडामहाराज व मातोश्री कृष्णामाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पाचव्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी हभप श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, श्री क्षेत्र पंढरपूर यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातील अभंगावर विस्तृत विवेचन केले. सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या प्रवचनमालेचे आयोजन एकनाथ चौधरी व मंदा चौधरी परिवारातर्फे करण्यात आले आहे. दुसºया दिवशी प्रवचनमालेच्या सुरुवातीला रूपाली व सचिन बक्षी यांनी अभंग गायले. प्रवचनाच्या सुरुवातीला महाराज म्हणाले की, हरीपाठ ज्ञानेश्वर महाराजांची विशेष रचना आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी हरीपाठ मांडला आहे. हरीपाठाला उपासनेचे आणि अभ्यासाचे मूल्य आहे. हरीपाठ ऐकताना त्यातून प्रकट झालेले प्रमेय, सद्उपदेश, वाच्यार्थ, लक्षार्थ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी त्यांनी हरीपाठातील पहिल्या अभंगाच्या ओवीचा विस्तृत पाठ मांडला. देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया..., महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीतून मोक्षप्राप्तीचा ध्यास मानवाला दिला आहे. पण अनेकांना मोक्षच माहिती नाही. ते म्हणतात की दु:खाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. महाराज म्हणाले की मोक्ष प्राप्तीसाठी देवाचिया दारी क्षणभर उभे राहा. पण उभे राहताना शरीरानेच नाही तर मनात, चिंतनात आणि स्मरणात त्या भगवंताला ठेवा. तरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक