शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

सरकारने शब्द पाळला नाही तर पुन्हा मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

नागपूर : सरकारने शब्द दिला म्हणून मूक आंदोलन थांबविले आहे. पुन्हा काही दिवस वाट पाहण्याची आमची तयारी आहे. मात्र, ...

नागपूर : सरकारने शब्द दिला म्हणून मूक आंदोलन थांबविले आहे. पुन्हा काही दिवस वाट पाहण्याची आमची तयारी आहे. मात्र, शब्द पाळला जाणार नसेल, तर पुन्हा एकदा मूक आंदोलन करू, असा इशारा खा. संभाजीराजे यांनी दिला.

महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सकल मराठा समाज विदर्भचे मुख्य संयोजक राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. विश्वजितसिंग किरदत्त, जयसिंग भोसले यांचीही उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या निनादात सभेला सुरुवात झाली. संभाजीराजे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार या दोघांच्याही जबाबदाऱ्या काय आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही. राज्य सरकारने परिपूर्ण मांडणी करून त्रुटी भरून काढाव्या. राज्यापालांकडे मसुदा सोपवावा. त्यांनी केंद्रीय आयोगाकडे व नंतर राष्ट्रपतींकडे निर्णयासाठी सोपवावा. केंद्राने अधिनियम १०२ चा वापर करून घटनादुरुस्ती करावी, वटहुकूम काढावा. निदान राज्य सरकारच्या हातात आज जे आहे, ते तरी करावे. मूक मोर्चातील सर्व मागण्यांचा विचार सरकारनेच करावा.

यावेळी संग्रामसिंग महाराज यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजे मुधोजी भोसले यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश शिर्के यांनी केले, तर आभार बबलू साळवे यांनी मानले.

नक्षल्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे

नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेतदेखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असल्याचा दावा केला आहे. कायदा हातात घेऊन काम करा असे शिवरायांनी कधीच सांगितले नव्हते. नक्षलवाद्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

आता जबाबदारी जनप्रतिनिधींची

संभाजीराजे म्हणाले, आक्रोश आणि ठोक मोर्चे आताही काढता येतील. मात्र, आज ही वेळ नाही. आरक्षण कसे मिळवता येईल, हे समजून घेण्याची गरज आहे. मैदानातील लढाई आम्ही केली, आता जबाबदारी जनप्रतिनिधींची आहे. आमदार, खासदार जनतेचे नोकर आहेत. आता आम्ही जनप्रतिनिधींनीच यासाठी पर्याय सांगितला पाहिजे. अधिवेशनात दोन तास वेळ द्या. यावर चर्चा घडवा. पर्याय सांगा. आमचा विरोध कुणालाही नाही. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन बोला.

मला खऱ्या अर्थाने शाहू-छत्रपतींचा वंशज व्हायचेय !

छत्रपतींच्या घराण्यात मी जन्मलो म्हणून वंशज असल्याचा मला अभिमान आहे. मात्र, मला शाहू-छत्रपती यांचे खऱ्या अर्थाने वंशज व्हायचे आहे. शिवाजी महाराजांची आयुष्यभर मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केले. राजश्री शाहू महाराजांनी राजवाडे बांधले नाही, बहुजन समाजाला न्याय दिला. मलासुद्धा त्याच मार्गावर चालून गरीब मराठ्यांना, वंचितांना न्याय द्यायचा आहे. समाजाला अहोरात्र वेळ द्यायचा आहे.

...