शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:45 IST

पोकळ घोषणा नको; सरकारला उत्तर द्यावे लागेल

नागपूर : महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी ५० हजार रुपये देणार होते. तो निधी अद्याप मिळालेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. मंडळांची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला मदत करण्याची गरज आहे. सरकारने तत्काळ मदत दिली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

वडेट्टीवार म्हणाले, सरकार हमी भावाची घोषणा करते. पण सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. २०१३ मध्ये ११ हजार रुपयांना कापूस विकला जात होता. आता कुठे मिळतोय दर, सरकारला उत्तर द्यावे लागेल. खतांचे भाव वाढले आहेत. सरकारच्या पोकळ घोषणा सुरू आहेत. यावर्षी धानाचे पीक निघाले आहे. ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यावर घोषणा करणार का ? ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राजू शेट्टी लढत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा अधिवेशनात जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.

जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर

इंडिया आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कुठल्या जागा कुणासाठी मेरिटवर सोडायची यावर चर्चा सुरू आहे. ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यानंतर या चर्चेला गती येईल. डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल. इंडियाच्या जागावाटपात कुठलाही अडथळा येणार नाही, अशा दावाही त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. हा भाजपचा निवडणूक आयोग झाला आहे. राम मंदिर नि:शुल्क दाखवू म्हणणाऱ्यांना नोटीस का दिली नाही, असा सवाल करीत काँग्रेसला घाबरून यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार