शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:45 IST

पोकळ घोषणा नको; सरकारला उत्तर द्यावे लागेल

नागपूर : महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी ५० हजार रुपये देणार होते. तो निधी अद्याप मिळालेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. मंडळांची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला मदत करण्याची गरज आहे. सरकारने तत्काळ मदत दिली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

वडेट्टीवार म्हणाले, सरकार हमी भावाची घोषणा करते. पण सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. २०१३ मध्ये ११ हजार रुपयांना कापूस विकला जात होता. आता कुठे मिळतोय दर, सरकारला उत्तर द्यावे लागेल. खतांचे भाव वाढले आहेत. सरकारच्या पोकळ घोषणा सुरू आहेत. यावर्षी धानाचे पीक निघाले आहे. ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यावर घोषणा करणार का ? ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राजू शेट्टी लढत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा अधिवेशनात जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.

जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर

इंडिया आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कुठल्या जागा कुणासाठी मेरिटवर सोडायची यावर चर्चा सुरू आहे. ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यानंतर या चर्चेला गती येईल. डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल. इंडियाच्या जागावाटपात कुठलाही अडथळा येणार नाही, अशा दावाही त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. हा भाजपचा निवडणूक आयोग झाला आहे. राम मंदिर नि:शुल्क दाखवू म्हणणाऱ्यांना नोटीस का दिली नाही, असा सवाल करीत काँग्रेसला घाबरून यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार