शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना निधी दिला नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 10:45 IST

पोकळ घोषणा नको; सरकारला उत्तर द्यावे लागेल

नागपूर : महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी ५० हजार रुपये देणार होते. तो निधी अद्याप मिळालेला नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. मंडळांची संख्या वाढवून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला मदत करण्याची गरज आहे. सरकारने तत्काळ मदत दिली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

वडेट्टीवार म्हणाले, सरकार हमी भावाची घोषणा करते. पण सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. २०१३ मध्ये ११ हजार रुपयांना कापूस विकला जात होता. आता कुठे मिळतोय दर, सरकारला उत्तर द्यावे लागेल. खतांचे भाव वाढले आहेत. सरकारच्या पोकळ घोषणा सुरू आहेत. यावर्षी धानाचे पीक निघाले आहे. ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, अशी मागणी आहे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यावर घोषणा करणार का ? ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राजू शेट्टी लढत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा अधिवेशनात जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.

जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर

इंडिया आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कुठल्या जागा कुणासाठी मेरिटवर सोडायची यावर चर्चा सुरू आहे. ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. त्यानंतर या चर्चेला गती येईल. डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट होईल. इंडियाच्या जागावाटपात कुठलाही अडथळा येणार नाही, अशा दावाही त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. हा भाजपचा निवडणूक आयोग झाला आहे. राम मंदिर नि:शुल्क दाखवू म्हणणाऱ्यांना नोटीस का दिली नाही, असा सवाल करीत काँग्रेसला घाबरून यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार