शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागपुरात पार पडला आदर्श निकाह; स्वागत समारंभही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:05 IST

सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.

ठळक मुद्देलग्न समारंभाच्या खर्चातून गरिबांना भोजनदान

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.बाबा ताज कॉलनीत राहणाऱ्या शमा आणि मुमताज काझी यांचे चिरंजीव मोहसिन काझी यांचा निकाह अफरोज बानो बशीर अहमद शेख यांची मुलगी नसरीन शेख हिच्यासोबत ५ एप्रिलला पार पडणार होता. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे विवाहाची झालेली संपूर्ण तयारी जागच्या जागीच राहिली. हा निकाह पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यानंतर लॉकडाऊन संपेल, अशी अपेक्षा होती. तो संपल्यानंतरच हा निकाह करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याने हा निकाहही आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली. ती लक्षात घेता दोन्ही कुटुंबीय तसेच त्यांच्या नातेवाईकांनी विचारविमर्श करून साध्या पद्धतीने निकाह पार पाडण्याचे ठरविले. त्यानुसार १८ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास वर-वधू आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्ती तसेच मौलवी अशा एकूण पाच जणांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला.विशेष म्हणजे, निकाहदरम्यान वर-वधूसह सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले. प्रत्येकाच्या तोंडावर मास्कही होता. आधी ठरल्याप्रमाणे निकाहच्या दुसºया दिवशी मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तो रद्द करून लग्न तसेच स्वागत समारंभावर येणारा संपूर्ण खर्च उत्तर नागपुरातील मुस्लिम वस्त्यांमधील गरिबांच्या भोजनदानावर खर्च करण्यात आला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस