शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नवजात बाळांसाठी सहा जिल्ह्यात आयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:09 IST

राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देआरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधानसभेत घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये नाशिक व अमरावती या दोन ठिकाणी आयसीयू सुरू करण्याचे निश्चित झाले असून आणखी चार जिल्ह्यांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत भास्कर जाधव, मनोहर भोईर आदींनी सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली. सदस्यांनी गेल्या वर्षी राज्यात १४,३६८ बालमृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापैकी ३०१३ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या उत्तरात केंद्र सरकारच्या एसआरएस सर्वेचा हवाला देत सांगितले की, २०११ मध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एक हजार मुलांमागे २५ अर्भकांचा मृत्यू होत होता. तो आता १९ वर आला आहे. तर देशात सरासरी अर्भकमृत्यूचा दर ३४ इतका आहे. महाराष्ट्र केवळ केरळ आणि तामिळनाडूपेक्षा मागे आहे. या मुद्यावर केरळलाही मागे टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी तीनस्तरीय योजना तयार करण्यात करण्यात आली आहे. यात न्यू बॉर्न केयर सेंटर, न्यू बॉर्न स्टॅबिलेशन युनिट आणि स्पेशल न्यू बॉर्न केयर युनिटची स्थापना करण्याचा यात समावेश आहे.डॉक्टर व परिचारिकांची पदे भरली जाणारडॉ. सावंत यांनी डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, डोंगर परिसरासाठी महसुलाचे नियम बदलण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचारी (परिचारिका) कुठून आणणार असे सांगत वाद ओढवून घेतला. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले, असे असेल तर आमदारांना सांगा, प्रत्येक आमदार एक यादी देऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यvidhan sabhaविधानसभा