शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बाळांसाठी सहा जिल्ह्यात आयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:09 IST

राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देआरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधानसभेत घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये नाशिक व अमरावती या दोन ठिकाणी आयसीयू सुरू करण्याचे निश्चित झाले असून आणखी चार जिल्ह्यांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत भास्कर जाधव, मनोहर भोईर आदींनी सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली. सदस्यांनी गेल्या वर्षी राज्यात १४,३६८ बालमृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापैकी ३०१३ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या उत्तरात केंद्र सरकारच्या एसआरएस सर्वेचा हवाला देत सांगितले की, २०११ मध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एक हजार मुलांमागे २५ अर्भकांचा मृत्यू होत होता. तो आता १९ वर आला आहे. तर देशात सरासरी अर्भकमृत्यूचा दर ३४ इतका आहे. महाराष्ट्र केवळ केरळ आणि तामिळनाडूपेक्षा मागे आहे. या मुद्यावर केरळलाही मागे टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी तीनस्तरीय योजना तयार करण्यात करण्यात आली आहे. यात न्यू बॉर्न केयर सेंटर, न्यू बॉर्न स्टॅबिलेशन युनिट आणि स्पेशल न्यू बॉर्न केयर युनिटची स्थापना करण्याचा यात समावेश आहे.डॉक्टर व परिचारिकांची पदे भरली जाणारडॉ. सावंत यांनी डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, डोंगर परिसरासाठी महसुलाचे नियम बदलण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचारी (परिचारिका) कुठून आणणार असे सांगत वाद ओढवून घेतला. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले, असे असेल तर आमदारांना सांगा, प्रत्येक आमदार एक यादी देऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यvidhan sabhaविधानसभा