शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

काँग्रेसपेक्षा आंबेडकरांशी युती करायला आवडेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:52 IST

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.

ठळक मुद्देराजेंद्र गवई : रिपाइं-भारिप-बसपाची व्हावी युती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.डॉ. गवई म्हणाले, २०१९ ची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. आंबेडकरी समाजाची मते विभागली जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रात रिपाइं-बसपा व भारिप बहुजन महासंघ यांची आघाडी व्हावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. यासंदर्भात आपण स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा आहेत. तर काँग्रेस ओवेसी यांच्यासोबत राहणार नाही, असे त्यांच्या नेत्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस व भारिपची युती होईल, असे वाटत नाही.आगामी लोकसभा निवडणुुकीत आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून लढणार आहोत. आपली तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती झाली तर मिळून लढू, अन्यथा नाईलाजास्तव काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू. परंतु अमरावतीची जागा ही पक्षाच्याच एबी फॉर्मवर लढवली जाईल, असेही ते म्हणाले.पत्रपरिषदेत प्रकाश कुंभे, प्राचार्य डी. दाभाडे, डी.एल.सोनपिंपळे, भीमराव वाहाणे, प्रा. बुद्धराज मून, सुहास भालेराव, एकनाथ ताकसांडे, विश्वनाथ खांडेकर आदी उपस्थित होते.प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवादी ठरवू नयेनक्षलवादी समर्थक म्हणून पोलिसांकडून सुरू असलेल्या अटकसत्राबाबत विचारले असता डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, पोलिसांनी आपला तपास करावा. परंतु समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. तपास योग्य व्हावा, कुठल्याही प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवदी ठरवण्यात येऊ नये.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर