शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपेक्षा आंबेडकरांशी युती करायला आवडेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:52 IST

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.

ठळक मुद्देराजेंद्र गवई : रिपाइं-भारिप-बसपाची व्हावी युती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.डॉ. गवई म्हणाले, २०१९ ची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. आंबेडकरी समाजाची मते विभागली जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रात रिपाइं-बसपा व भारिप बहुजन महासंघ यांची आघाडी व्हावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. यासंदर्भात आपण स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा आहेत. तर काँग्रेस ओवेसी यांच्यासोबत राहणार नाही, असे त्यांच्या नेत्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस व भारिपची युती होईल, असे वाटत नाही.आगामी लोकसभा निवडणुुकीत आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून लढणार आहोत. आपली तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती झाली तर मिळून लढू, अन्यथा नाईलाजास्तव काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू. परंतु अमरावतीची जागा ही पक्षाच्याच एबी फॉर्मवर लढवली जाईल, असेही ते म्हणाले.पत्रपरिषदेत प्रकाश कुंभे, प्राचार्य डी. दाभाडे, डी.एल.सोनपिंपळे, भीमराव वाहाणे, प्रा. बुद्धराज मून, सुहास भालेराव, एकनाथ ताकसांडे, विश्वनाथ खांडेकर आदी उपस्थित होते.प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवादी ठरवू नयेनक्षलवादी समर्थक म्हणून पोलिसांकडून सुरू असलेल्या अटकसत्राबाबत विचारले असता डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, पोलिसांनी आपला तपास करावा. परंतु समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. तपास योग्य व्हावा, कुठल्याही प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवदी ठरवण्यात येऊ नये.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर