शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला मान्य नाही - नितीन गडकरी

By प्रविण खापरे | Updated: October 9, 2022 16:42 IST

हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला.

नागपूर - ‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला पुर्णत: मान्य नाही. जे ‘ओल्ड’ आहे आणि काहीच कामाचे नाही, ते भंगारात काढावे आणि जुन्यातील जे उपयुक्त असे ‘गोल्ड’ आहे, ते स्विकारावे, अशा विचारांचा मी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

रविवारी पर्सिस्टंटच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात हिंदू रिसर्च फाऊंडेशन व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने इस्त्रोचे शास्त्रज्ञ व ‘स्वदेशी लिक्विड इंजिन - विकास’चे संकल्पक व विकासक पद्मभूषण एस. नाम्बीनारायणन यांना ‘आचार्य भारद्वाज’ तर रसायन शास्त्रातील भिष्मपितामह पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘नागार्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नितीन गडकरी भारतीय इतिहास, विज्ञान आणि आधुनिक संशोधन यावर बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू काँग्रेसचे संस्थापक व अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद होते तर व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसुदन पेन्ना, मंगलयान (मार्स ऑर्बिट मिशन - एमओएम)चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. एस. अरुणन, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक व हिंदू रिसर्च फाऊंडेशनचे संयोजक डॉ. तुकाराम भाल उपस्थित होते.

प्राचीन भारतातील सर्वच गोष्टी उपयुक्त होते, असे नाही. परंतु, त्यातील जे उपयुक्त होते, त्यांवर संशोधन होणे आणि विकसित होणे गरजेचे आहे. त्यावर अनेकांनी संशोधन केले आहे. परंतु, ते जर सेफ डिपॉझिटमध्ये बंद असेल तर त्याचा काय उपयोग. ते बाहेर आले पाहिजे आणि नव्या पिढीकडे हस्तांतरित झाले पाहिजे. शिवाय, होत असलेले नवे संशोधन केवळ कागदावर असून कामाचे नाही तर ते प्रमाणित झाले तरच त्याचा उपयोग होणार असल्याचे गडकरी म्हणाले. डॉ. माशेलकर यांचे हळद पेटेंट मिळविण्याविषयीचा संघर्ष आणि एस. नाम्बीनारायणन यांनी स्वस्त आणि परवडेल अशी रॉकेट यंत्रणा निर्माण केले. ते संशोधकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. स्वस्त, परवडेल, उपयुक्त ठरेल आणि त्याचा लाभ देशाला होईल, असे संशोधन होणे ही काळाची गरज आहे. इस्त्रोने सॅलाईटसाठी जी लिथियम बॅटरी वापरली, त्याचा उपयोग देशाच्या परिवहनासाठी का होऊ नये, असा विचार करणे अभिप्रेत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अनिता तिडवे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. तुकाराम भाल यांनी केले.

हिंदुत्त्वाला सेक्युलर राजकारणाने संकुचित केले

हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला. गेल्या सरकारांनी समाजाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केले. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आहे. परंतु, सेक्युलर नावाच्या धर्मनिरपेक्ष अर्थाने हिंदुत्त्वाला संकुचित करण्याचे षडयंत्र राबविले. प्रतिमा विरूद्ध वास्तविकता, असा हा संघर्ष होता, असेही गडकरी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर