शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला मान्य नाही - नितीन गडकरी

By प्रविण खापरे | Updated: October 9, 2022 16:42 IST

हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला.

नागपूर - ‘ओल्ड इज गोल्ड’ ही संकल्पना मला पुर्णत: मान्य नाही. जे ‘ओल्ड’ आहे आणि काहीच कामाचे नाही, ते भंगारात काढावे आणि जुन्यातील जे उपयुक्त असे ‘गोल्ड’ आहे, ते स्विकारावे, अशा विचारांचा मी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

रविवारी पर्सिस्टंटच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात हिंदू रिसर्च फाऊंडेशन व मैत्री परिवार संस्थेच्या वतीने इस्त्रोचे शास्त्रज्ञ व ‘स्वदेशी लिक्विड इंजिन - विकास’चे संकल्पक व विकासक पद्मभूषण एस. नाम्बीनारायणन यांना ‘आचार्य भारद्वाज’ तर रसायन शास्त्रातील भिष्मपितामह पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘नागार्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी नितीन गडकरी भारतीय इतिहास, विज्ञान आणि आधुनिक संशोधन यावर बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू काँग्रेसचे संस्थापक व अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद होते तर व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसुदन पेन्ना, मंगलयान (मार्स ऑर्बिट मिशन - एमओएम)चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. एस. अरुणन, सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक व हिंदू रिसर्च फाऊंडेशनचे संयोजक डॉ. तुकाराम भाल उपस्थित होते.

प्राचीन भारतातील सर्वच गोष्टी उपयुक्त होते, असे नाही. परंतु, त्यातील जे उपयुक्त होते, त्यांवर संशोधन होणे आणि विकसित होणे गरजेचे आहे. त्यावर अनेकांनी संशोधन केले आहे. परंतु, ते जर सेफ डिपॉझिटमध्ये बंद असेल तर त्याचा काय उपयोग. ते बाहेर आले पाहिजे आणि नव्या पिढीकडे हस्तांतरित झाले पाहिजे. शिवाय, होत असलेले नवे संशोधन केवळ कागदावर असून कामाचे नाही तर ते प्रमाणित झाले तरच त्याचा उपयोग होणार असल्याचे गडकरी म्हणाले. डॉ. माशेलकर यांचे हळद पेटेंट मिळविण्याविषयीचा संघर्ष आणि एस. नाम्बीनारायणन यांनी स्वस्त आणि परवडेल अशी रॉकेट यंत्रणा निर्माण केले. ते संशोधकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. स्वस्त, परवडेल, उपयुक्त ठरेल आणि त्याचा लाभ देशाला होईल, असे संशोधन होणे ही काळाची गरज आहे. इस्त्रोने सॅलाईटसाठी जी लिथियम बॅटरी वापरली, त्याचा उपयोग देशाच्या परिवहनासाठी का होऊ नये, असा विचार करणे अभिप्रेत आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अनिता तिडवे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. तुकाराम भाल यांनी केले.

हिंदुत्त्वाला सेक्युलर राजकारणाने संकुचित केले

हिंदुत्त्वावर बोलताना नितीन गडकरी यांनी हिंदु, हिंदुत्त्वाला इंग्रजांनी निर्माण केलेल्या प्रोपोगंडामुळे आणि नंतर गेल्या ७५ वर्षात सेक्युलर नावाच्या राजकारणाने संकुचित केल्याचा आरोप केला. गेल्या सरकारांनी समाजाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण केले. आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आहे. परंतु, सेक्युलर नावाच्या धर्मनिरपेक्ष अर्थाने हिंदुत्त्वाला संकुचित करण्याचे षडयंत्र राबविले. प्रतिमा विरूद्ध वास्तविकता, असा हा संघर्ष होता, असेही गडकरी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर