शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

.. तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची माझी तयारी; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:26 IST

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देराजकीय संन्यासाची घोषणा हा माझा ‘जुमला’च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.नाना पटोले व कॉंग्रेसच्या नेत्यांवर निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. मी जर लोकसभा निवडणूकीत नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणा पटोले यांनी केली होती. यासंदर्भात त्यांना विचारले असता तो माझा केवळ ‘जुमला’च होता. भाजपचे लोक संन्याशांना राजकारणात आणतात आणि मी एकदा पराभूत झालो तर संन्यास घ्यायला सांगतात. मी राजकीय संन्यास घणार नाही, असे त्यांनी सांगितले. गडकरी व भाजप नेते यांनी आतापर्यंत १०० जुमले केले होते. मी जर एक जुमला केला तर काय बिघडले, असे प्रतिपादन पटोले यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पटोले यांनी दिले.निवडणूकीत अडथळा केल्याप्रकरणी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुद्गल व जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात आमच्यासोबत दुजाभाव केला. आम्हाला ईव्हीएमची तपासणी करुन दिली नाही. मतदार यादी उशीरा दिली. पटोले यांनी मुद्गल यांना न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अभिजीत वंजारी, अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.गिरीश महाजन ‘फोकनाड’यावेळी नाना पटोले यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘फोकनाड’ असे म्हणून त्यांच्यावर जहरी टीका केली. महाजन यांना जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ निराकरणाच्या अर्थसंकल्पाच्या निधीची माहिती नाही. त्यांना उत्तर देण्यासाठीच मी राजकीय संन्यासाचा ‘जुमला’ मांडला, असे नाना पटोले म्हणाले.तापमान ‘सेल्सिअस’मध्ये की टक्क्यांमध्ये?या पत्रपरिषदेदरम्यान पटोले हे फार संभ्रमात असलेले दिसून आले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नाव ते सातत्याने अश्विनी म्हणून घेत होते. याशिवाय नागपुरचे तापमान ६७ टक्क्यांवर पोहोचले असे अगोदर वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्यावर शहरातील तापमान ‘सेल्सिअस’ऐवजी चक्क ४७ टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्या मागे मास्टरमाइंड कोण?यावेळी पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीवरदेखील टीका केली. भाजप, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यातूनच वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागे ‘मास्टरमाईंड’ कोण आहे याच विचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले