शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

घरगुती वादातून पती-पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:44 IST

कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविहिरीत घेतली उडी : नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल) : कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.गजानन नत्थू धोटे (४६) व शुभांगी गजानन धोटे (४०) रा. शेटे ले-आऊट, अर्जुननगर, काटोल अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गजानन हा मूळचा काटोल तालुक्यातील येरला (धोटे) येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपासून अर्जुननगरातील शेटे ले-आऊटमध्ये राहायचा. तिथे त्याचे स्वत:चे घर आहे. तो मंगळवारी (दि. १६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी दारू पिऊन आला आणि पत्नी शुभांगीसोबत भांडायला लागला. भांडण विकोपास गेल्याने शुभांगीने दार उघडून जवळच असलेल्या विहिरीच्या दिशेने धाव घेतली आणि लगेच विहिरीत उडी मारली.तिच्याच मागे गजानन निघाला होता. त्यानेही तिच्या पाठोपाठ त्याच विहिरीत उडी मारली. हा प्रकार लक्षात येताच एका शेजाऱ्याने त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत दोर सोडला. शुभांगीने दोर पकडला असता, गजानननेही दार पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभांगीच्या हातून दोर सुटला आणि ती पाण्यात बुडाली. दुसरीकडे, उडी मारताना गजाननच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला पोहता येत असले तरी तो पोहू शकला नाही. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वृत्त लिहिस्तो या घटनेबाबत कुणीही पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर