शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर कारागृहातील शेकडो कैद्यांना गृहमंत्र्यांच्या ‘कॉल’ची प्रतीक्षा

By नरेश डोंगरे | Updated: January 6, 2024 23:34 IST

तामिळनाडूतील ग्रुपने केली व्यवस्था : यंत्रणा सज्ज, शुभारंभाच्या तारखेकडे लागले डोळे

नागपूर :  रुक्ष वातावरणात बोलती बंद झालेल्या अवस्थेत जगणारे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील शेकडो कैदी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'कॉल'ची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत. एकदा त्यांची तारीख मिळाली की, या कैद्यांचेही हरविलेले सूर पुन्हा त्यांच्या कानावर येणार आहेत. त्याचमुळे मध्यवर्ती कारागृहातील शेकडो कैदी कानात जीव आणून गृहमंत्री फडणवीस यांच्या 'कॉल'ची वाट बघत आहेत.

कारागृहाच्या भेसूर भिंतीआड डांबले गेलेल्या कैद्यांना महिनोमहिने आपल्या नातेवाईकांना भेटता, बघता येत नाही. भेटणे बघणेच काय, आपल्या प्रियजणांचा आवाजही ते ऐकू शकत नाहीत. त्यामुळे रुक्ष वातावरणात राहणाऱ्या अनेक कैद्यांचे सूरच हरवल्यासारखे होतात. बहुतांश कैदी एकांतात स्वत:शीच बोलतात. दुसऱ्याशी ते अबोला धरून वागतात. ते फारसे कुणात मिसळत नाही.

गेल्या काही वर्षांत कैद्यांना कारागृहात डांबल्यानंतर त्यांच्यात सुधारणा कशी करता येईल आणि त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल, यावर चर्चा सुरू आहे. विविध कार्यक्रम, उपक्रम, नातेवाईकांची भेट, गळाभेट असे उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीतून कैद्यांमध्ये सकारात्मकता रुजत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे असे उपक्रम आणखी विकसित करण्यात येत आहेत. कैद्यांना आपल्या नातेवाईकांशी, प्रियजणांशी बोलता यावे म्हणून 'टेलिफोन' (क्वॉईन बॉक्स)चीही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, क्वॉईन बॉक्स संपर्कात अनेक अडचणी आल्याने तामिळनाडू आणि केरळमधील काही संस्था-संघटनांनी विविध ठिकाणच्या कैद्यांसाठी स्मार्ट फोनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात करण्यात आली. त्यातील त्रुटी दूर करून आणखी काही नव्या सुधारणांसह राज्यातील येरवडा आणि ऑर्थर रोड तुरुंगात ही संवाद यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. कैद्याचे व्हेरिफिकेशन करून त्याला एक स्वाईप कार्ड उपलब्ध करून दिले जाणार असून, या कार्डला स्वाईप करताच त्याच्या संपर्कातील दोन ते तीन क्रमांक डॅश बोर्डवर दिसतील. त्यातील एक क्रमांक डायल करून कैदी एका वेळी ६ ते १० मिनिटे त्याच्या प्रियजणांशी बोलू शकणार आहे. आठवड्यातून दोन अर्थात महिन्यातून ८ वेळा तो या सुविधेचा लाभ घेणार असून, त्यासाठी १ रुपया प्रतिमिनिट असे शुल्क त्याला अदा करावे लागणार आहे.

कारागृहात लागले २० संच

ऑर्थर आणि येरवडा कारागृहानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहात ही सुविधा सुरू केली जाणार असून, त्यासाठी तमिळनाडूतील ॲलन ग्रुपने येथे ठिकठिकाणी २० संच लावले आहे. कैद्यांचे कार्डही तयार झाले आहेत. या सुविधेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे नियोजित शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी त्यांची तारीख मिळावी म्हणून नागपूरसह पुणे मुख्यालयातूनही प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री फडणवीस यांची तारीख मिळताच फोनची घंटी खणखणार आहे. त्यामुळे शुभारंभाच्या कार्यक्रमाची तारीख कळविणारा फोन तातडीने यावा म्हणून मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनासह शेकडो कैदी कानात जीव आणून फडणवीस यांच्या 'कॉल'ची वाट बघत आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर