शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

'त्यांना' शिकायचे आहे, 'आधार' मिळेल का?; रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांचे भवितव्य अंधारात

By मंगेश व्यवहारे | Updated: June 30, 2023 11:49 IST

जन्मदाखला नसल्याने शाळेत प्रवेशाच्या अडचणी

नागपूर : सरकारने जन्मत:च मुलाचे आधार कार्ड उपलब्ध करण्याची सोय केली आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारच्या माध्यमातून ओळख दिली आहे; पण नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांकडे आधार नसल्याने ते निराधार ठरत आहेत. कारण त्या मुलांच्या पालकांकडे त्यांच्या जन्माचे दाखलेच नाहीत. येथे आजही प्रसूती घरीच होते. टोलीमध्ये गेल्या काही वर्षांपासून खुशाल ढाक नावाचा तरुण शिक्षणाचे बीज रोवत आहे. जन्माचा दाखला नसल्याने त्यांचे आधार कार्ड बनत नसल्यामुळे या मुलांच्या शिक्षणात अडचण येत आहे.

येथे राहणारा हिमेश नरसिम्हा कांबळे १३ वर्षांचा मूकबधिर मुलगा. याच्याकडे आधार नाही म्हणून त्याला शाळेत घेतले गेले नाही. हिमेशला वडील नाहीत. आईच त्याचा सांभाळ करीत आहे. हिमेशचा जन्म घरीच झाला होता. त्यामुळे त्याच्या आईकडे त्याच्या जन्माचा दाखला नाही. त्याचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाही. परिणामी, त्याला विशेष शिक्षण मिळू शकत नाही. हिमेशची व्यथा पुढे आल्यानंतर खुशाल ढाक यांनी ४,५०० लोकवस्तीच्या टोली भागात आधार कार्ड नसलेल्या मुलांचा शोध घेतला. त्यात शेकडो मुले समोर आली. कारण आई- वडील अशिक्षित असल्याने या मुलांचा जन्म त्यांच्या घरीच झाला होता. ३ ते १४ वयोगटातील ही मुले आहेत. खुशाल गेल्या काही वर्षांपासून या भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शाळेत दाखला मिळण्यासाठी सरकारने आधार कार्डची सक्ती केली आहे. यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने त्यांच्या प्रवेशात अडथळा येत आहे.

- प्रवेशात अडथळा येणार नाही

यासंदर्भात शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, आधार नसेल, तर शाळेत प्रवेश नाकारता येत नाही, तर मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाचे प्रमुख डॉ. अतिक खान म्हणाले की, जन्म होऊन एक वर्षापेक्षा जास्त अवधी झाल्यानंतरही झोन कार्यालयात बाळाची नोंद झाली नसल्यास पोलिस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पुढची प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतरच जन्माचा दाखला मिळेल.

- प्रशासन दखल घेणार का?

ही वस्ती अतिशय मागास आहे. मुलांच्या पालकांना शिक्षणाचा गंध नाही. आम्ही पालकांचे मन परिवर्तन करून कुठेतरी येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यात प्रशासनाच्या सहकार्याचीही गरज आहे. छोट्या- छोट्या दस्तावेजामुळे जर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास अडथळा आल्यास, ही मुले कधीच शिकणार नाहीत.

- खुशाल ढाक, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर