शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नवीन नियम आल्याने जिल्ह्यात शेकडो जन्मदाखले रखडले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:23 IST

Nagpur : असा आहे नवीन नियम, काय कारण ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस प्रमाणपत्रे रोखण्यासाठी १२ मार्चपासून राज्य सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केला आहेत. शासनाने स्पष्ट केले की, ज्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित आहेत, त्यांची नोंदणी आता जिल्हा दंडाधिकारी, विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या अधिकृत परवानगीशिवाय होणार नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर अशा प्रकारची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्यानंतर नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ ४१ जणांना नवीन प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहे. शेकडो जन्मदाखले रखडले आहेत. 

सहा महिन्यांत किती प्रमाणपत्रे रद्दगेल्या सहा महिन्यांत नागपूर जिल्ह्यातील १८४१ जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यांना पुन्हा नव्याने नवीन नियमानुसार अर्ज करावा लागत आहे. नवीन नियमानुसार त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जात आहेत.

असा आहे नवीन नियम, काय कारण ?नवीन नियमानुसार ज्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित आहेत, त्यांची नोंदणी आता जिल्हा दंडाधिकारी, विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या अधिकृत परवानगीशिवाय होणार नाही. यामुळे अपूर्ण, बेकायदेशीर किंवा खोटी कागदपत्रे सादर करून नोंदणी करण्याच्या घटनांना आळा बसेल. संबंधित अधिकाऱ्यांनी पुराव्यांची काटेकोर तपासणी करूनच प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांत काही परदेशी नागरिकांनी महाराष्ट्रात खोटी जन्म नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शासनाने आता कोणत्याही व्यक्तीला जन्म-मृत्यू नोंदणी करताना त्यांच्या स्थायिक पत्त्याच्या योग्य पडताळणीसह आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.

विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले, नोकरीचा अर्ज भरता येईनाजन्माच्या दाखला नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशास अडचणी येत आहेत. नोकरीचे अर्जसुद्धा भरण्यास अडचणी येताहेत.

पुरावे, कागदपत्रांची जंत्रीजन्माच्या नोंदीसाठी : रुग्णालयाचा दाखला, लसीकरण नोंदी, शाळा प्रवेशाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र रहिवासी पुरावे (वीज बिल, पाणीपट्टी, मालमत्तेची कागदपत्रे)

पडताळणी, शपथपत्राचा त्रास वेगळाचनवीन नियमानुसार विविध पुरावे कागदपत्रे सादर केल्यानंतरही विलंबाने अर्ज सादर करणाऱ्यांना शपथपत्र आणि त्यांची सादर केलेली माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा पोलिस विभागाकडून चौकशी अहवालसुद्धा मागविण्यात येत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

रुग्णालयातील जन्मनोंद प्रत्येकालाच मिळेल का ?रुग्णालयातील जन्माची नोंद मिळण्यास मुख्य अडचणी येत आहेत. प्रत्येकालाच ती सहजासहजी भेटत नाही.

टॅग्स :nagpurनागपूर