शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:01 IST

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील पाणीटंचाई विचारात घेता ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध भागातील हॅन्डपंपची पाहणी केली असता प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. सदर येथील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यानंतरही हॅन्डपंप दुरुस्त केला नाही. पाहणी केली असता नादुरुस्त हॅन्डपंपकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले.पारडी रोड परिसरात पाण्याची टंचाई आहे. असे असूनही येथील हॅन्डपंप अनेक महिन्यापासून नादुरूस्त आहे. नारा-नारी भागात पाण्याची टंचाई आहे. अनेक वस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. या भागातील दोन हॅन्डपंप दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका हॅन्डपंप जवळ कचरा साचला आहे. नंदनवन रोडवरील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कळमना मार्केट परिसरातील अनेक वस्त्यात पाणीटंचाई आहे. या परिसरातील हॅन्डपंप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग नाही. हॅन्डपंप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विक्रे त्यांनी सांगितले. धंतोली भागातील हॅन्डपंपाजवळ कचरा साचला आहे. पंप नादुरुस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही.टीबी वॉर्ड चौकातील हा हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा खराब परिस्थितीत पडला आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा साचण्यासोबतच तणकटही वाढले आहे. याचा उपयोग नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी