शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:01 IST

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील पाणीटंचाई विचारात घेता ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध भागातील हॅन्डपंपची पाहणी केली असता प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. सदर येथील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यानंतरही हॅन्डपंप दुरुस्त केला नाही. पाहणी केली असता नादुरुस्त हॅन्डपंपकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले.पारडी रोड परिसरात पाण्याची टंचाई आहे. असे असूनही येथील हॅन्डपंप अनेक महिन्यापासून नादुरूस्त आहे. नारा-नारी भागात पाण्याची टंचाई आहे. अनेक वस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. या भागातील दोन हॅन्डपंप दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका हॅन्डपंप जवळ कचरा साचला आहे. नंदनवन रोडवरील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कळमना मार्केट परिसरातील अनेक वस्त्यात पाणीटंचाई आहे. या परिसरातील हॅन्डपंप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग नाही. हॅन्डपंप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विक्रे त्यांनी सांगितले. धंतोली भागातील हॅन्डपंपाजवळ कचरा साचला आहे. पंप नादुरुस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही.टीबी वॉर्ड चौकातील हा हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा खराब परिस्थितीत पडला आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा साचण्यासोबतच तणकटही वाढले आहे. याचा उपयोग नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी