शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त : नागपूर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:01 IST

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण्याचे निर्देश प्रशासनाने जलप्रदाय विभागाला दिले आहे. परंतु शहरातील शेकडो हॅन्डपंप नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रशासनाचे निर्देश कागदावरच आहेत. यामुळे दुरुस्तीच्या नावावर होणारा लाखो रुपयांचा खर्च जातो कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील पाणीटंचाई विचारात घेता ‘लोकमत’ चमूने शहरातील विविध भागातील हॅन्डपंपची पाहणी केली असता प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले. सदर येथील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतु त्यानंतरही हॅन्डपंप दुरुस्त केला नाही. पाहणी केली असता नादुरुस्त हॅन्डपंपकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले.पारडी रोड परिसरात पाण्याची टंचाई आहे. असे असूनही येथील हॅन्डपंप अनेक महिन्यापासून नादुरूस्त आहे. नारा-नारी भागात पाण्याची टंचाई आहे. अनेक वस्त्यांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. या भागातील दोन हॅन्डपंप दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले. एका हॅन्डपंप जवळ कचरा साचला आहे. नंदनवन रोडवरील हॅन्डपंप मागील काही महिन्यापासून नादुरुस्त आहे. दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कळमना मार्केट परिसरातील अनेक वस्त्यात पाणीटंचाई आहे. या परिसरातील हॅन्डपंप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग नाही. हॅन्डपंप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विक्रे त्यांनी सांगितले. धंतोली भागातील हॅन्डपंपाजवळ कचरा साचला आहे. पंप नादुरुस्त असल्याने त्याचा वापर केला जात नाही.टीबी वॉर्ड चौकातील हा हातपंप गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा खराब परिस्थितीत पडला आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा साचण्यासोबतच तणकटही वाढले आहे. याचा उपयोग नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी