शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

माणसातील माणुसकीच श्रेष्ठ

By admin | Updated: October 19, 2014 01:00 IST

मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली

फुले-आंबेडकर विचारधारा : राजा ढाले यांचे प्रतिपादन नागपूर : मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली व त्यामुळे सर्व जग माणसातील मैत्रीमुळे जवळ आले. त्यामुळे माणसातील माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी येथे केले. फुले, आंबेडकर विचारधारातर्फे धम्म क्रांतीदिनानिमित्त मधुरम सभागृह हिंदी मोरभवन झांशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. राजा ढाले पुढे म्हणाले, या देशाला बौद्धिकदृष्ट्या डोळस करायचे असेल तर येथील लोकशाही बळकट करायला हवी. लोकशाही शिवाय कुणालाही तरणोपाय नाही. जोपर्यंत या देशात गुलामांचा धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत लोकशाही असूनही हुकूमशाही टिकणार आहे, आणि ही हुकूमशाही पुन्हा पेशवाईच्या तंत्रात आपणास गुलाम करणारी आहे. जोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आहे, तोपर्यंत माणुसकीचा झरा सतत वाहत राहणार आहे. या देशातील तळागाळातला माणूस उंच शिखरावर पोहोचू शकतो. स्त्री पुरुष समानता गप्पा मारून होणार नाही. तर त्याकरिता खांद्याला खांदा लावून हा वैचारिक लढा पुढे नेण्याची गरज आहे. आमचे आदर्श बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांनी आपल्या स्वकर्तृत्त्वाने सिद्ध केलेले आहे. आमचे ध्येय व धोरण त्यांच्याच मार्गाने जाणारे आहे. याप्रसंगी डॉ. इंदिरा आठवले, डॉ. विमलकिर्ती यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अग्निवेश शेलारे यांनी केले. प्रा. प्रशांत नगरकर यांनी आभार मानले. मिलिंद बनसोड, पांडुरंग मानकर, सारीपुत्र नगरकर, सिद्धार्थ मेश्राम, अशोक बोरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)