शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

माणसातील माणुसकीच श्रेष्ठ

By admin | Updated: October 19, 2014 01:00 IST

मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली

फुले-आंबेडकर विचारधारा : राजा ढाले यांचे प्रतिपादन नागपूर : मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली व त्यामुळे सर्व जग माणसातील मैत्रीमुळे जवळ आले. त्यामुळे माणसातील माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी येथे केले. फुले, आंबेडकर विचारधारातर्फे धम्म क्रांतीदिनानिमित्त मधुरम सभागृह हिंदी मोरभवन झांशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. राजा ढाले पुढे म्हणाले, या देशाला बौद्धिकदृष्ट्या डोळस करायचे असेल तर येथील लोकशाही बळकट करायला हवी. लोकशाही शिवाय कुणालाही तरणोपाय नाही. जोपर्यंत या देशात गुलामांचा धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत लोकशाही असूनही हुकूमशाही टिकणार आहे, आणि ही हुकूमशाही पुन्हा पेशवाईच्या तंत्रात आपणास गुलाम करणारी आहे. जोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आहे, तोपर्यंत माणुसकीचा झरा सतत वाहत राहणार आहे. या देशातील तळागाळातला माणूस उंच शिखरावर पोहोचू शकतो. स्त्री पुरुष समानता गप्पा मारून होणार नाही. तर त्याकरिता खांद्याला खांदा लावून हा वैचारिक लढा पुढे नेण्याची गरज आहे. आमचे आदर्श बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांनी आपल्या स्वकर्तृत्त्वाने सिद्ध केलेले आहे. आमचे ध्येय व धोरण त्यांच्याच मार्गाने जाणारे आहे. याप्रसंगी डॉ. इंदिरा आठवले, डॉ. विमलकिर्ती यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अग्निवेश शेलारे यांनी केले. प्रा. प्रशांत नगरकर यांनी आभार मानले. मिलिंद बनसोड, पांडुरंग मानकर, सारीपुत्र नगरकर, सिद्धार्थ मेश्राम, अशोक बोरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)