शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष पेटला; प्राण्यांच्या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:17 IST

६ वर्षांत ३३१ नागरिकांचा मृत्यू: जनावरांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ

योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली असतानाच मानव आणि वन्यजीव संघर्षही वाढला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२४-२५ मध्ये वाघ, बिबट आणि अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ६५४ ग्रामीण जखमी झाले तर ६१ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळच्या रामटेक, देवलापार, पारशिवनीसह अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात ११ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वनविभागावर आता वन्यजिवांसोबतच नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेचीही जबाबदारी आली आहे.

माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांनी काढलेल्या माहितीनुसार, केवळ सहा वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३,३६४ जण जखमी झाले. २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १२,४१० जनावरे जखमी झाली. तर, ४,६०९ बकऱ्या तसेच जनावरांचा मृत्यू झाला. विदर्भात वनक्षेत्रात संरक्षित जंगल असल्यामुळे वाघ, बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ते भक्ष्य शोधण्यासाठी कोर जंगलातून निघून बफर तसेच ग्रामीण क्षेत्रात शिरतात. त्यांना शेतात काम करणारे, जनावरे चारणारे आणि सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले ग्रामीण नागरिक दिसताच ते हल्ला करतात. शेत आणि गावात बांधून असलेल्या जनावरांची ते शिकार करतात.

जनजागृती आवश्यकवन मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार, वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या ग्रामिणांना वन्यजीवांच्या आजूबाजूलाच राहावे लागते. अशात नागरिकांमध्ये जंगलात जाताना काय खबरदारी घ्यायची या विषयाच्या संबंधाने जनजागृती करणे आवश्यक आहे.

हल्ल्याचे वर्ष आणि नागरिकांची संख्यावर्ष                       जख्मी                  मृत्यू २०१९-२०                ४२९                      २७२०२०-२१                ४००                       ४३२०२१-२२                २०४                       २५२०२२-२३                ३८५                      ७८२०२३-२४               १२९२                      ९७२०२४-२५               ६५४                       ६१

टॅग्स :nagpurनागपूर