शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष पेटला; प्राण्यांच्या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:17 IST

६ वर्षांत ३३१ नागरिकांचा मृत्यू: जनावरांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ

योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली असतानाच मानव आणि वन्यजीव संघर्षही वाढला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२४-२५ मध्ये वाघ, बिबट आणि अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ६५४ ग्रामीण जखमी झाले तर ६१ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळच्या रामटेक, देवलापार, पारशिवनीसह अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात ११ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वनविभागावर आता वन्यजिवांसोबतच नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेचीही जबाबदारी आली आहे.

माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांनी काढलेल्या माहितीनुसार, केवळ सहा वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३,३६४ जण जखमी झाले. २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १२,४१० जनावरे जखमी झाली. तर, ४,६०९ बकऱ्या तसेच जनावरांचा मृत्यू झाला. विदर्भात वनक्षेत्रात संरक्षित जंगल असल्यामुळे वाघ, बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ते भक्ष्य शोधण्यासाठी कोर जंगलातून निघून बफर तसेच ग्रामीण क्षेत्रात शिरतात. त्यांना शेतात काम करणारे, जनावरे चारणारे आणि सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले ग्रामीण नागरिक दिसताच ते हल्ला करतात. शेत आणि गावात बांधून असलेल्या जनावरांची ते शिकार करतात.

जनजागृती आवश्यकवन मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार, वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या ग्रामिणांना वन्यजीवांच्या आजूबाजूलाच राहावे लागते. अशात नागरिकांमध्ये जंगलात जाताना काय खबरदारी घ्यायची या विषयाच्या संबंधाने जनजागृती करणे आवश्यक आहे.

हल्ल्याचे वर्ष आणि नागरिकांची संख्यावर्ष                       जख्मी                  मृत्यू २०१९-२०                ४२९                      २७२०२०-२१                ४००                       ४३२०२१-२२                २०४                       २५२०२२-२३                ३८५                      ७८२०२३-२४               १२९२                      ९७२०२४-२५               ६५४                       ६१

टॅग्स :nagpurनागपूर