शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

महाराष्ट्रात मानव वन्यजीव संघर्ष पेटला; प्राण्यांच्या हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:17 IST

६ वर्षांत ३३१ नागरिकांचा मृत्यू: जनावरांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ

योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली असतानाच मानव आणि वन्यजीव संघर्षही वाढला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२४-२५ मध्ये वाघ, बिबट आणि अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ६५४ ग्रामीण जखमी झाले तर ६१ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळच्या रामटेक, देवलापार, पारशिवनीसह अन्य परिसरात वाघाच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात ११ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वनविभागावर आता वन्यजिवांसोबतच नागरिकांच्या जिवाच्या सुरक्षेचीही जबाबदारी आली आहे.

माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांनी काढलेल्या माहितीनुसार, केवळ सहा वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३,३६४ जण जखमी झाले. २०२४-२५ मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १२,४१० जनावरे जखमी झाली. तर, ४,६०९ बकऱ्या तसेच जनावरांचा मृत्यू झाला. विदर्भात वनक्षेत्रात संरक्षित जंगल असल्यामुळे वाघ, बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ते भक्ष्य शोधण्यासाठी कोर जंगलातून निघून बफर तसेच ग्रामीण क्षेत्रात शिरतात. त्यांना शेतात काम करणारे, जनावरे चारणारे आणि सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेले ग्रामीण नागरिक दिसताच ते हल्ला करतात. शेत आणि गावात बांधून असलेल्या जनावरांची ते शिकार करतात.

जनजागृती आवश्यकवन मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार, वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या ग्रामिणांना वन्यजीवांच्या आजूबाजूलाच राहावे लागते. अशात नागरिकांमध्ये जंगलात जाताना काय खबरदारी घ्यायची या विषयाच्या संबंधाने जनजागृती करणे आवश्यक आहे.

हल्ल्याचे वर्ष आणि नागरिकांची संख्यावर्ष                       जख्मी                  मृत्यू २०१९-२०                ४२९                      २७२०२०-२१                ४००                       ४३२०२१-२२                २०४                       २५२०२२-२३                ३८५                      ७८२०२३-२४               १२९२                      ९७२०२४-२५               ६५४                       ६१

टॅग्स :nagpurनागपूर