शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पितृछत्र हरपले, तरी सोडली नाही जिद्द, वेदनेच्या वाटेवर परिश्रमातून उमलली यशाची फुलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 14:54 IST

दु:खावर मात करत या तिन्ही विद्यार्थिनींनी बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.

ठळक मुद्देरुचिकाच्या संघर्षाला जिद्दीची जोडअर्कजा आणि पलकने केली दु:खावर मात

नागपूर : कोरोना एखाद्या महापुरासारखाच होता. त्याने माणसांना घेऊन जाताना कुठलीही तमा बाळगली नाही. अर्कजा आणि पलक यांच्या घरातही त्याने थैमान घातले. यात दोघींचे पितृछत्र हिरावले. मात्र या दुःखातही दोन्ही विद्यार्थिनी खचल्या नाही. संकटावर मात करून परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. प्रतिकूल परिस्थितीतही बारावीच्या परीक्षेत त्यांनी यशाची कमान उभारली. बारावीचा निकाल लागला अन् दोघींनीही यशाची पहिली पायरी घवघवीत गुणांनी गाठली. अर्कजा संजय देशमुख हिने विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण प्राप्त केले. तर, पलक राजेश मेश्राम हिने ८५.८० टक्के गुण मिळवले.

रुचिका धनराज राऊत हिची कहाणी ही काहीशी अशीच आहे. तिचा आई देवाघरी गेली व वडील शेतमजूर असल्यामुळे घरकामाची जबाबदारी तिच्यावर आली. घरचे सर्व आवरासावर झाले की मग कुठे अभ्यास; पण अशातही तिने गुणवंतांच्या यादीत नाव झळकविले. शिक्षणाबद्दलची आवड आणि आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द रुचिकाने बाळगली अन् बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.

अर्कजाला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचयं

मानेवाडा परिसरात राहणारी अर्कजा संजय देशमुख ही डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तिने बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६.३३ टक्के गुण प्राप्त केले. तीचे यश प्रकटल्यावर महाविद्यालयाने कौतुक केले. मात्र आपल्या यशाबद्दल बोलताना जराही तिने आपल्या वेदना, दु:ख व्यक्त केले नाही. चेहऱ्यावर हास्य ठेवत तिने सर्वांचे आभार मानले; पण वडिलांबद्दल विचारल्यावर ती काहीशी भावनात्मक झाली. बाबा गेलेत कोरोनात. एवढेच बोलून तिने स्वत:ला दुसऱ्याच क्षणी सावरून घेतले. या दुःखाची चर्चा व्हावी, मुलीला सहानुभूती मिळावी, असे कुटुंबियांकडूनही अजिबात वाटले नाही. खरे तर अर्कजासाठी हे वर्ष करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ती मुळातच हुशार असली तरी असे प्रसंग मनात सल करून जातात. परिणाम करिअरवर होतो. अर्कजाने मात्र त्यावर मात केली. अर्कजाला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. त्या दृष्टिकोनातून तिची वाटचाल सुरू आहे. नियमित अभ्यास वर्षभर तिने केला; पण शेवटच्या तीन महिन्यांत तिने अभ्यासावर जास्तच फोकस केला.

परिस्थितीला न जुमानता लष्करीबागची पलक चमकली

लष्करीबाग, पाचपावली भागात राहणाऱ्या पलक राजेश मेश्राम या विद्यार्थिनीचीही यशकथा अशीच आहे. जाईबाई चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या पलकने बारावीच्या परीक्षेत ८५.८० टक्के गुण मिळवले. पलकचे वडील एका कंपनीत कामाला होते, परिस्थिती बेताचीच पतीही शिक्षणाची जीद्द उराशी बाळगून मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर दुसरी मुलगी पदवी अभ्यासक्रम करीत आहे. गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि या कुटुंबावर डोंगर कोसळला.

आधारच तुटल्याने पुढे काय, हा प्रश्न समोर उभा होता. आई उभी ठाकली. एका महाविद्यालयात काम मिळविले. परिस्थिती अशी की बहुतेक वेळा पलकला पाचपावली ते शाळा असलेल्या सदरपर्यंत पायी ये-जा करावी लागायची. मात्र तिने अभ्यास सोडला नाही. आज तिच्या परिश्रमाचे सोने झाले. पलकला यूपीएससीत यशस्वी व्हायचे आहे आणि त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्यासाठी तिची तयारी आहे.

आई गेली, वडील शेतमजूर, घरची जबाबदारी तरीही बारावीत गुणवंत

पारशिवनी तालुक्यातील बाबूळवाडा तालुक्यातील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची रुचिका धनराज राऊत ही विद्यार्थिनी. आई शेतात काम करीत असताना वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. घरात मोठी असल्याने घरकामाची सर्व जबाबदारी तिच्यावर आली. वडील शेतमजूर, घरात आजोबा आणि लहान बहीण या सर्वांचे करूनसवरून ती शाळेला जायची. तालुक्यातील नवेगाव खैरी येथे झोपडीवजा घरात राहणाऱ्या रुचिकाने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले. शाळेच्या प्राचार्य राजश्री उखरे व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कोरोनाच्या काळातही तिच्या अभ्यासात खंड पडला नाही. आई-वडिलांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करून, प्रशासकीय सेवेत करिअर करायचे स्वप्न तिने बाळगले आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थी