शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

भूमिहीन आदिवासींचे कसे होणार सबलीकरण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:06 IST

भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजनेसाठी विभागाला शेतीच उपलब्ध होत नसल्याने काही प्रकल्प कार्यालयाने ही योजना बंद केली आहे तर काही प्रकल्पात योजनेसाठी तरतूद केल्यानंतरही जमीनच उपलब्ध होत नसल्याने निधी इतर योजनेवर खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देविभागाला जमीन विकण्यास कुणीच तयार नाही : अनेक प्रकल्पात योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजनेसाठी विभागाला शेतीच उपलब्ध होत नसल्याने काही प्रकल्प कार्यालयाने ही योजना बंद केली आहे तर काही प्रकल्पात योजनेसाठी तरतूद केल्यानंतरही जमीनच उपलब्ध होत नसल्याने निधी इतर योजनेवर खर्च करावा लागत आहे.२०१८-१९ या वर्षासाठी नागपूर प्रकल्प कार्यालयाने १ कोटी व वर्धा प्रकल्प कार्यालयाने १.५५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. अ.भा. आदिवासी युवा परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष स्वप्निल मसराम यांनी यासंदर्भात मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात हा निधी खर्चच झाला नसल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी विभागाकडे काही प्रस्ताव शेतकऱ्यांनी दिले आहे. या योजनेसंदर्भात विभागातर्फे जनजागृती करण्यात आली नसल्यामुळे लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला नाही, अशी त्यांची ओरड आहे. पण यासंदर्भात नागपूरचे प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, योजनेसाठी जमीनच उपलब्ध होत नाही. योजनेंतर्गत शासकीय दरावर आदिवासी विभाग शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करतो. वर्धा जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार झाला होता. परंतु ऐनवेळी त्यांनी जमिनीची विक्री करण्यास नकार दिला. त्यामुळे जमीन उपलब्ध होऊ शकली नाही. पण त्यासाठी तरतूद केलेला निधी वाया गेला नाही, त्याचा इतर योजनेवर खर्च करण्यात आला आहे.काय होती योजनाभूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजुरी करणाºया दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासनाचे दराप्रमाणे २ एकर बागायत अथवा ४ एकर जिरायत शेतजमीन खरेदी करून देण्यात येते. यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीमध्ये शेतजमिनीचे दर , लाभार्थी निवड , मूल्यांकन इत्यादीबाबत निर्णय घेण्यात येतो. शेतजमीन खरेदीसाठी लाभार्थ्यास ५० टक्के शासन अनुदान व ५० टक्के कर्ज स्वरुपात अनुदान देण्यात येते. देण्यात आलेल्या कर्जाचे १० वर्षपर्यंत परत फेडीचे हप्ते ठरविण्यात येतात. कर्जाची फेड खरेदी केल्यानंतर २ वर्षानंतर करण्यात येते व सदर कर्ज बिनव्याजी असते.जमीनच उपलब्ध होत नाहीया योजनेसाठी विभागाला ज्या दरावर जमीन खरेदी करायची आहे. तो शासकीय दर शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही प्रकल्पांनी ही योजनाच बंद केली आहे.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाVidarbhaविदर्भ