शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कसे थांबणार माता व बालमृत्यू ? केवळ ४८ टक्के अनुदान खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:01 IST

राज्यातील बाल तसेच मातामृत्यू थांबण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माता व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना हात आखडता घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढत असताना एप्रिल २०१५ पासून सव्वातीन वर्षात प्राप्त झालेल्या अनुदानापैकी केवळ ४८ टक्के अनुदानच खर्च करण्यात आले आहे. अशा स्थितीत राज्यातील माता व बालमृत्यू थांबणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून राज्य शासनाच्या अनास्थेची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमाता, बालमृत्यू नियंत्रणाबाबत शासनाची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील बाल तसेच मातामृत्यू थांबण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माता व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना हात आखडता घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढत असताना एप्रिल २०१५ पासून सव्वातीन वर्षात प्राप्त झालेल्या अनुदानापैकी केवळ ४८ टक्के अनुदानच खर्च करण्यात आले आहे. अशा स्थितीत राज्यातील माता व बालमृत्यू थांबणार तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून राज्य शासनाच्या अनास्थेची बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत राज्यात किती अर्भक, माता, बाल, उपजत मृत्यू झाले, सर्वात जास्त मृत्यू कोणत्या जिल्ह्यात झाले, मृत्यू नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर किती निधी खर्च झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार अर्भक, माता, बाल, उपजत मृत्यू रोखण्यासाठी शासनामार्फत माता व बाल आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत माता आरोग्य, बाल आरोग्य, नियमित लसीकरण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासाठी अनुदान प्रदान करण्यात येते. या कालावधीत १,२८१ कोटी ३५ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. यापैकी ६१६ कोटी ९१ लाक ५८ हजार रुपयांचे अनुदानच प्रत्यक्षात खर्च झाले. खर्चाची एकूण टक्केवारी ही अवघी ४९.१५ टक्के इतकीच आहे. माता आरोग्य कार्यक्रमातील ५१.६३ टक्के, बाल आरोग्य कार्यक्रमातील २९.४४ टक्के, नियमित लसीकरण कार्यक्रमातील ४६.२६ टक्के तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ४४.८२ टक्के अनुदानच खर्च झाले.अर्भक, बालमृत्यूंचे प्रमाण वाढीसदरम्यान १ जानेवारी २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत राज्यामध्ये अर्भक व बालमृत्यूंचे प्रमाणदेखील वाढीस लागल्याचे चित्र आहे. या कालावधीत राज्यात ४५ हजार ३३१ अर्भक मृत्यू, ७ हजार ५३३ बालमृत्यू, ३ हजार १५४ मातामृत्यू तर २४ हजार ६७३ उपजत मृत्यूंची नोंद झाली. उपजत मृत्यूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. या कालावधीत राज्यात ४४ लाख ६ हजार ३०६ बालकांचा जन्म झाला. यातील २१ लाख २१ हजार ८३० जन्म हे मुलींचे होते. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९२.८८ टक्के इतके होते.

 

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताnagpurनागपूर