शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

ताडोबातील गावे कशी हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:55 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.२००८ मध्ये न्यायालयाने वने व वन्यप्राण्यांच्या संवर्धनाकरिता स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकेचे कामकाज पाहणारे न्यायालय मित्र वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान यांनी रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांना वनांच्या बाहेर स्थलांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारी वकील एन. आर. राव यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थलांतरासाठी आधी गावकऱ्यांनी त्यांच्या पसंतीचे ठिकाणी सांगणे आवश्यक असल्याची व त्यानंतरच राज्य सरकार आवश्यक कार्यवाही सुरू करू शकत असल्याची माहिती दिली. सरकारच्या या मोघम स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. स्थलांतरणासाठी पसंतीचे ठिकाण सांगण्याची संधी मिळणे म्हणजे स्थलांतरण टाळण्याचा पर्याय होत नाही. हे प्रकरण गेल्या १० वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. ते पाहता गावकरी दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेच गावे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी व ही गावे चार महिन्यांत कशी स्थलांतरित होतील यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प