शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

किती ही लूट? कळमन्यात कांदा २० रुपये, तर घराजवळ ४० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 22:36 IST

consumers looting कळमना ठोक बाजारात आणि कॉटन मार्केट उपबाजारात भाज्यांच्या किमती आटोक्यात असल्या तरीही किरकोळ बाजारात दुपटीपेक्षा जास्त भावात भाज्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे कोथिंबीर १००-१२० रुपये किलो : लसणाची फोडणीही महागली; शेतकऱ्यांना मिळत नाही भाव

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कळमना ठोक बाजारात आणि कॉटन मार्केट उपबाजारातभाज्यांच्या किमती आटोक्यात असल्या तरीही किरकोळ बाजारात दुपटीपेक्षा जास्त भावात भाज्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले. जास्त भावाचा गरीब व सर्वसामान्यांना फटका बसतो. महागाईच्या काळात सर्वच वस्तू महाग झाल्याची झळ लोकांना बसत असून, आता स्वयंपाकघरातील भाज्याही महाग झाल्या आहेत.

खरिपाची पेरणी आणि मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढतात, असा सर्वांनाच अनुभव आहे; पण यंदा सर्वत्र मुसळधार पावसामुळे भाज्यांचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतून नागपुरात भाज्यांची आवक कमीच आहे. किरकोळमध्ये सर्वच भाज्यांचे भाव ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. गुरुवारी ठोक बाजारात कोथिंबीर ८० रुपये किलो, तर किरकोळमध्ये १२० रुपये किलो दराने विक्री झाली. याशिवाय पावसामुळे आवक कमी असल्याने लसणाची फोडणी महागली आहे. ठोक बाजारात चांगल्या दर्जाचे बटाटे १० ते १२ रुपये किलो असताना किरकोळमध्ये ३० रुपये भावात विक्री होत आहे. टोमॅटोसुद्धा ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत.

सोमवारी क्वाॅर्टर बाजारातील भाजी विक्रेते सदानंद तरार म्हणाले, सध्या पावसामुळे आवक कमी असल्याने ठोक बाजारातसुद्धा भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्या रोखीत खरेदी कराव्या लागतात. विक्रीसाठी आणलेल्या भाज्या एकाच दिवशी विकल्या जात नाहीत. त्यातील २० टक्के भाज्या खराब होतात. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट असतात.

हा बघा दरांमधील फरक (प्रतिकिलो दर)

भाजीपाला कळमना बाजार    घराजवळ

वांगे ४० ६०

कोथिंबीर ८० १२०

मिरची ३० ६०

टोमॅटो २५ ५०

फूलकोबी २५ ५०

पत्ताकोबी १५ ४०

ढेमसे ३० ६०

बटाटे १२ ३०

पालक ३० ६०

भेंडी २५ ५०

सर्वच बाजारपेठांत वेगवेगळे भाव

शहरातील दोन ठोक बाजारांत भाज्यांचे भाव आटोक्यात असले तरीही शहरातील विविध किरकोळ बाजारात भाव वेगवेगळे आहेत. वाहतुकीचा खर्च जोडून भाज्यांची विक्री करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नंदनवन बाजारात पालक ६० रुपये किलो तर धरमपेठ बाजारात ८० रुपये किलो आहे. सोमवारी क्वाॅर्टरमध्ये टोमॅटो ५० रुपये, महालमध्ये ४० रुपये, रमणा मारुती ४० रुपये, तर धरमपेठ बाजारात ६० रुपये भाव आहे. याशिवाय उमरेड रोड व पारडी बाजारात फूलकोबी ४० रुपये, महाल व सोमवारी क्वाॅर्टर ५० रुपये, सतरंजीपुरा बाजारात ६० रुपये भाव आहे. याशिवाय भेंडीच्या भावातही बरीच तफावत आहे. नंदनवनमध्ये ५० रुपये, महाल ४० रुपये, पारडी ४० रुपये, धरमपेठ व सोमलवाड्यात ६० रुपये भाव आहे.

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !

ठोक बाजारात जिल्ह्यातील शेतकरी हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, फूलकोबी, चवळी व पालक भाजी, चवळी शेंगा विक्रीला आणतात. कालच्यापेक्षा आज जास्त भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; पण बाजारातील अडते आणि व्यापारी शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत भाज्या खरेदी करतात. पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात, असा अनुभव आहे. सावनेर येथील देवानंद ठाकरे म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये गुरुवारी टोमॅटोला १५ ते २० रुपये किलो भाव मिळाला; पण व्यापाऱ्यांनी ३० रुपये किलो भावाने विक्री केली. जास्त मालाचे रोखीने पैसे मिळत असल्याने एवढा भाव मिळाल्याचे समाधान आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोला १० रुपये किलो भाव मिळाला होता.

बाजारात आवकीच्या प्रमाणावर भाज्यांचे भाव ठरतात. त्यामुळे दरदिवशी भाज्यांचे भाव सारखे नसतात. कोथिंबिरीची आवक कमी असल्याने शेतकऱ्यांना ६० रुपये किलो, तर फूलकोबीला २० रुपये भाव मिळाला. व्यापारी शेतकऱ्यांकडून रोखीने माल खरेदी करतात. त्यामुळे फरक असतोच.

-राम महाजन, व्यापारी

कळमना बाजारात अन्य जिल्हे आणि राज्यांतील भाज्यांची आवक होते. माल खरेदी करताना व्यापारी आणि आडत्यांचा नफा ठरलेला असतो. ही साखळी अनेक वर्षांपासून सुरू आहे. व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो. आवकीच्या प्रमाणावर भाव ठरतात.

-नंदकिशोर गौर, व्यापारी

अर्धा पाव व किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळील आठवडी बाजारात भाज्या खरेदी करतो; पण होलसेलपेक्षा दुप्पट भाव द्यावा लागतो. त्यामुळे बजेट बिघडते.

-सुनंदा सव्वालाखे, गृहिणी

कमी भावात भाज्यांची खरेदी ही कसरत आहे. ग्राहकांची मागणी पाहून विक्रेतेही जास्त भाव सांगतात. भाज्या चांगल्या दिसल्या की, जास्त भावातही खरेदी कराव्या लागतात. किरकोळमध्ये भाव जास्तच असतात.

-सोनम सुपले, गृहिणी

टॅग्स :onionकांदाvegetableभाज्याMarketबाजार