शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पाच वर्षांत किती झाडे तोडली ? नागपूर मनपाकडे माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 22:48 IST

मागील पाच वर्षांत शहरात बेकायदेशीररीत्या किती झाडे तोडण्यात आली व दंडाच्या माध्यमातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहिती मनपाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देहा कसा कारभार? : दंडापासून मिळालेल्या महसुलाची माहितीदेखील उपलब्ध नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहराची ओळख देशातील ‘ग्रीनसिटी’ अशी व्हावी, असा प्रयत्न सुरू असताना काही जणांकडून मात्र विनापरवानगी झाडे कापण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. मनपाने यासंदर्भात कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासकीय अनास्था इतकी आहे की मागील पाच वर्षांत शहरात बेकायदेशीररीत्या किती झाडे तोडण्यात आली व दंडाच्या माध्यमातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहितीदेखील मनपाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात मनपाच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षांत विनापरवानगी किती झाडे तोडण्यात आली, दंडापोटी किती महसूल प्राप्त झाला, या वर्षी ‘व्हीएनआयटी’मध्ये किती झाडे तोडण्यात आली, किती संस्थांनी परवानगी मागितली व त्यासाठी मनपाने किती ‘डिपॉझिट’ घेतले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत विनापरवानगी तोडण्यात आलेल्या झाडांची माहिती मनपाने संकलितच केलेली नाही. मनपाच्या या उत्तरातूनच अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.११ महिन्यांत विनापरवानगी ३५० झाडांची कत्तलदरम्यान, मनपाने २०१७ ची आकडेवारी उपलब्ध करुन दिली असून १ जानेवारी ते १५ डिसेंबर या कालावधीत शहरात विनापरवानगी ३५३ झाडाची कत्तल करण्यात आली. यात ‘व्हीएनआयटी’तील ६२ झाडांचा समावेश आहे. झाडे कापलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचे मनपाने स्पष्ट केले. दरम्यान मनपाच्या दहाही झोनमध्ये लोकसहभागातून ९ महिन्यांत ३२ हजार ४७१ वृक्षांची लागवड करण्यात आली.

 

टॅग्स :nagpurनागपूर