शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कसे येणार प्रदूषण नियंत्रणात? आरटीओतील पीयूसी यंत्र डब्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 10:39 IST

डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे१८ वर्षांपासून १२० यंत्रांचे कॅलिब्रेशन नाही

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनांमधून उत्सर्जित होणारे घातक घटक वातावरणात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांना वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देताना ‘पीयूसी’ तपासणी करण्याचे निर्देश दिले. यासाठी डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, हे यंत्र आजही डब्यातच पडून असून, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या इंधनांमुळे वातावरणात सतत वायू उत्सर्जित होतो. या वायूमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईड, पार्टोक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश असतो. हे घटक मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करतात. ही तपासणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी आरटीओ कार्यालयातून फिटनेस प्रमाणपत्र देताना वाहनाची प्रदूषणाची पातळी ओळखण्यासाठी ‘पोल्युशन अंडर कंट्रोल सटिर्फिकेट’ (पीयूसी) देणारे यंत्र दिले. राज्यातील सुमारे ३५ आरटीओ कार्यालयांना वर्ष २०००मध्ये डिझेल व पेट्रोलवरील वाहनांसाठी प्रत्येकी एक-एक असे ७० पीयूसी यंत्र दिले. त्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये ५० आरटीओ कार्यालयांना पुन्हा डिझेल वाहनांच्या तपासणीसाठी प्रत्येकी एक यंत्र दिले. या यंत्रामुळे राज्यातील काही आरटीओ कार्यालयात ‘पीयूसी’ यंत्राची संख्या तीनवर गेली. यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र जेव्हापासून हे यंत्र आरटीओ कार्यालयात उपलब्ध झाले तेव्हापासून या यंत्राचा वापरच नाही. संबंधित कंपनीकडून यंत्रात वाहनानुसार ‘कॅलिब्रेशन’च करण्यात आले नसल्याने यंत्र सुरूच नाही. वाहन तपासणीच्यावेळी मोटार वाहन निरीक्षक चौकाचौकातील पीयूसी केंद्रावरून काढलेल्या प्रमाणपत्रालाच ग्राह्य मानून योग्यता प्रमाणपत्र देत आहे. विशेष म्हणजे, यातील काही केंद्रातून मिळणारे प्रमाणपत्र वाहने न तपासताच मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.प्राप्त माहितीनुसार, परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना त्यांच्याकडे असलेले ‘पीयूसी’ यंत्र वापरात आहे किंवा नाही तसेच त्याचे ‘कॅलिब्रेशन’ झाले किंवा नाही, असे विचारले आहे. अनेक कार्यालयाने ‘कॅलिब्रेशन’ झाले नसल्याचे कळविले असल्याची माहिती आहे.

निरीक्षकाकडून पीयूसी चाचणी करणे अशक्यचराज्यात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा मोठा भार आरटीओ कार्यालयांवर पडत आहे. त्या तुलनेत कार्यालयात मनुष्यबळाची संख्या अल्प आहे. यातच योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी ‘इन कॅमेरा’ होते. प्रत्येक वाहनाच्या तपासणीचा वेळ ठरवून दिला आहे. या वेळात मोटार वाहन निरीक्षकाने स्वत: पीयूसी चाचणी करणे शक्य नाही. काही कार्यालयांनी त्या स्थितीतही हे यंत्र चालविण्याचा प्रयत्न केला तर काहीमध्ये बॅटरी नसल्याचे आढळून आले.

टॅग्स :pollutionप्रदूषण