शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कसे बनणार आदिवासी युवक आयएएस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:00 IST

आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतरही ना पुस्तके मिळालीना ग्रंथालयाची सोयनियमित वर्गही झाले नाहीत

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. जून महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मानव्यशास्त्र विभागाच्या इमारतीतील एका अडगळीत पडलेल्या हॉलमध्ये हे केंद्र सुरू झाले. नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान ज्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार होत्या त्या पुरविण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी प्रशिक्षणाचे नियमित वर्गसुद्धा झाले नाहीत. आता फक्त प्रशिक्षणाचे पाच महिने शिल्लक आहेत. प्री आणि मेन्सची तयारी या पाच महिन्यात करायची आहे. ती कशी होणार, याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.या केंद्रासाठी विभागाने १ कोटी ८३ लाख २७ हजार रुपयांची तरतूद केली होती. असे असतानाही हे विद्यार्थी अडगळीत पडलेल्या विद्यापीठाच्या एका हॉलमध्ये कुठल्याही सुविधा नसतानाही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. १५ जुलै २०१४ मध्ये शासनाने आदिवासींच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. ट्रायबल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि राज्यातील सर्व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात येणार होते.२६ डिसेंबर २०१६ ला बार्टीच्या माध्यमातून ‘सीईटी’ घेण्यात आली. मार्च २०१७ मध्ये निकाल जाहीर होऊन राज्यात २२५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तेव्हा राज्यात पुणे वगळता हे केंद्र कुठल्याच विद्यापीठात सुरू झाले नव्हते. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन जून २०१८ मध्ये नागपूर विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आले. नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणादरम्यान या विद्यार्थ्यांना चार हजार रुपये विद्यावेतन व सहा हजार रुपये अभ्यासाच्या साहित्यासाठी अनुदान देण्यात येणार होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून विद्यार्थी प्रशिक्षणासाठी नागपुरात आले. प्रशिक्षण सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण या विद्यार्थ्यांना ना विद्यावेतन मिळाले, नाही पुस्तकाचे अनुदान. शासन निर्णयानुसार या केंद्रात लायब्ररीसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण येथे ना लायब्ररी बनली, नाही अभ्यासाला पुरक पुस्तके उपलब्ध झाली. साधे वर्तमानपत्र सुद्धा येथे पोहचत नाही. तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्याचेही नियमित वर्ग होत नाही. त्यामुळे तीन महिन्यात एकही विषय पूर्ण झाला नाही. विद्यार्थ्यांना आपल्या घरून राहण्याचा, खाण्याचा, अभ्यासाच्या साहित्याचा खर्च करावा लागत आहे. कोट्यवधीची तरतूद असतानाही, ही परिस्थिती बघून काही विद्यार्थी प्रशिक्षण सोडून गेले आहे.

केंद्राचीही दूरवस्थाविद्यापीठात नावापुरते हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्राला भेट दिली असता, तुटलेल्या खिडक्यांच्या तावदानातून पावसाचे पाणी हॉलमध्ये आले होते. हे केंद्र सुरू करणे, बंद करण्यासाठी कुठलाही कर्मचारी नव्हता. विद्यार्थ्यांना साधे पाणी पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्या विभागात जावे लागत होते. समन्वयकाची गेल्या महिन्याभरापासून भेट नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. काही विद्यार्थी २४ तास येथे बसूनच अभ्यास करीत असल्याने त्यांच्याच भरवशावर केंद्र सुरू आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी