शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कसे बनणार आदिवासी युवक आयएएस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:00 IST

आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतरही ना पुस्तके मिळालीना ग्रंथालयाची सोयनियमित वर्गही झाले नाहीत

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. जून महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मानव्यशास्त्र विभागाच्या इमारतीतील एका अडगळीत पडलेल्या हॉलमध्ये हे केंद्र सुरू झाले. नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान ज्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार होत्या त्या पुरविण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी प्रशिक्षणाचे नियमित वर्गसुद्धा झाले नाहीत. आता फक्त प्रशिक्षणाचे पाच महिने शिल्लक आहेत. प्री आणि मेन्सची तयारी या पाच महिन्यात करायची आहे. ती कशी होणार, याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.या केंद्रासाठी विभागाने १ कोटी ८३ लाख २७ हजार रुपयांची तरतूद केली होती. असे असतानाही हे विद्यार्थी अडगळीत पडलेल्या विद्यापीठाच्या एका हॉलमध्ये कुठल्याही सुविधा नसतानाही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. १५ जुलै २०१४ मध्ये शासनाने आदिवासींच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. ट्रायबल रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि राज्यातील सर्व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात येणार होते.२६ डिसेंबर २०१६ ला बार्टीच्या माध्यमातून ‘सीईटी’ घेण्यात आली. मार्च २०१७ मध्ये निकाल जाहीर होऊन राज्यात २२५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तेव्हा राज्यात पुणे वगळता हे केंद्र कुठल्याच विद्यापीठात सुरू झाले नव्हते. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन जून २०१८ मध्ये नागपूर विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आले. नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणादरम्यान या विद्यार्थ्यांना चार हजार रुपये विद्यावेतन व सहा हजार रुपये अभ्यासाच्या साहित्यासाठी अनुदान देण्यात येणार होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून विद्यार्थी प्रशिक्षणासाठी नागपुरात आले. प्रशिक्षण सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण या विद्यार्थ्यांना ना विद्यावेतन मिळाले, नाही पुस्तकाचे अनुदान. शासन निर्णयानुसार या केंद्रात लायब्ररीसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण येथे ना लायब्ररी बनली, नाही अभ्यासाला पुरक पुस्तके उपलब्ध झाली. साधे वर्तमानपत्र सुद्धा येथे पोहचत नाही. तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्याचेही नियमित वर्ग होत नाही. त्यामुळे तीन महिन्यात एकही विषय पूर्ण झाला नाही. विद्यार्थ्यांना आपल्या घरून राहण्याचा, खाण्याचा, अभ्यासाच्या साहित्याचा खर्च करावा लागत आहे. कोट्यवधीची तरतूद असतानाही, ही परिस्थिती बघून काही विद्यार्थी प्रशिक्षण सोडून गेले आहे.

केंद्राचीही दूरवस्थाविद्यापीठात नावापुरते हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्राला भेट दिली असता, तुटलेल्या खिडक्यांच्या तावदानातून पावसाचे पाणी हॉलमध्ये आले होते. हे केंद्र सुरू करणे, बंद करण्यासाठी कुठलाही कर्मचारी नव्हता. विद्यार्थ्यांना साधे पाणी पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्या विभागात जावे लागत होते. समन्वयकाची गेल्या महिन्याभरापासून भेट नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. काही विद्यार्थी २४ तास येथे बसूनच अभ्यास करीत असल्याने त्यांच्याच भरवशावर केंद्र सुरू आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी