शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

हॉटेल्स पाळत नाहीत ‘बेस्ट बिफोर’चा नियम

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 7, 2023 19:22 IST

सणासुदीत ग्राहकांना खरेदी करावी लागते शिळी मिठाई

नागपूर : सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये  उत्साह दिसून येत आहे. या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. बहुतांश हॉटेल्स अन्न व औषध प्रशासन विभागाचे ‘बेस्ट बिफोर’चा नियम पाळत नसल्याचे दिसून येते. याकडे विभागाचे दुर्लक्ष असून शिळी मिठाई खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. 

खाद्यतेल, तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घेण्याची जबाबदारी विभागाची कमी तर ग्राहकांची जास्त झाली आहे. सणांच्या काळात ग्राहकांना शुद्ध पदार्थ मिळावे म्हणून अधिकाºयांनी दुकानांच्या तपासण्या आणि अन्न पदार्थांचे नमूने तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी ग्राहक संघटनांकडून होऊ लागली आहे.

‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड पाहिला का? 

हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. अर्थात मिठाईची उत्पादन आणि वापरण्यायोग्य तारीख लिहिणे आवश्यक आहे. पण रक्षाबंधन सणात बहुतांश हॉटेल्समध्ये मिठाईच्या ट्रेवर हा बोर्ड दिसला नाही. याचा अर्थ अनेक हॉटेल्समध्ये तारीख उलटून गेलेल्या मिठाईची विक्री झाली असावी, अशी शक्यता आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई शून्य आहे. 

दुधाची मिठाई २४ तास, तर मोतीचूर लाडू ४८ तास हॉटेल्समधील वेगवेगळ्या मिठाईच्या ट्रेवर वेगवेगळ्या तारखेचे टॅग लावणे बंधनकारक आहे. नियमानुसार हॉटेल मालकाला दुधाची मिठाई २४ तास आणि मोतीचूरचे लाडू ४८ तासांच्या आत विकणे बंधनकारक आहे. खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आतच करावे. तसेच ते साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे. मिठाईची चवीत फरक जाणवल्यास ती नष्ट करावी.

शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये शिळ्या मिठाईची विक्री केल्याची अनेक उदाहरणे आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे प्रत्येक हॉटेल्सची तपासणी करण्यात येत नसल्यामुळे हॉटेल्सचे फावते. पण दुधाचे पदार्थ २४ तासाच्या आत विकावे लागतात. पण अनेक हॉटेल्समध्ये शिळ्या मिठाईची विक्री करण्यात येत असल्यामुळे विषबाधेची शक्यता जास्त असते. 

चार महिन्यांत १२ दुकानांवर कारवायाभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. ते नसल्यास विभाग कारवाई करते. यावर्षी सणांच्या काळात १२ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी अर्थात ‘बेस्ट बिफोर’ यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. या संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सणांच्या दिवसात ही मोहीम कठोरपणे राबवू. अभय देशपांडे, उपायुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :nagpurनागपूर