शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

हॉटेल व्यावसायिक म्हणतात, त्यापेक्षा बंद ठेवणे बरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:43 IST

Nagpur news राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. लग्नकार्य आणि सांस्कृतिक समारंभानाही परवानगी नाकारली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे. एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदर सिंग रेणू व सचिव दीपक खुराणा यांनी यासंदर्भात एक संयुक्त पत्रक प्रकाशित करून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध व्यक्त केला आहे. हा व्यवसाय रात्रीच सुरू असतो, हे प्रशासनाला माहीत असतानाही सायंकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी देणे आश्चर्यकारक आहे. हॉटेल्स व्यावसायिकांवर हा अन्याय आहे. यापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवले तर वीज, कर्मचाऱ्यांचे पगार, मेंटेनन्सचा खर्च तरी वाचेल. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतानाही असा निर्णय तिथे नाही. विदर्भासोबतच ही सावत्रपणाची वागणूक का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन सेवेसाठी प्रशासनाने रेस्टाॅरंटचे किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असताना, दुसरीकडे असा निर्णय सुसंगत नाही. संपूर्ण लॉकडाऊन काळात याच व्यवसायातील अनेक रेस्टॉरंट्स‌ने अन्न शिजवून गरजूंची सेवा केली होती. त्याचे हे प्रतिफळ म्हणावे काय? सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.

- तेजिंदर सिंग रेणू, अध्यक्ष, एनआरएचए

...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस