शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वसतिगृहे सुरू, खानावळीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 18:19 IST

समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ : तातडीने मेस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेली वसतिगृहे सुरू झाली आहेत. विद्यार्थी मोठ्या संख्येने वसतिगृहात आलेसुद्धा आहेत. परंतु, वसतिगृहातील मेस (खानावळ) बंद असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. तेव्हा शासकीय वसतिगृहातील मेस सुद्धा तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

तब्बल १७ महिन्यांपासून बंद असलेली वसतिगृहे मेडिकल, पॅरामेडिकल तसेच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर गेल्या ४ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला. यात महाविद्यालयातील प्राचार्यांची परवानगी, डबल डोस, आरटीपीसीआर या सर्व अटी टाकण्यात आल्या. सर्व अटींची पूर्तता करून विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी वसतिगृहात प्रवेश केला. वसतिगृह सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांसाठी खानावळीची सोयदेखील समाज कल्याण विभागाद्वारे करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, आठवडा लोटूनसुद्धा विभागाने कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी वारंवार मेस सुरू करण्यासंदर्भात सहायक आयुक्त तसेच उपायुक्त यांना विनंती केली; पण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केराची टोपली दाखविली. कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची समस्या उद्भवली आहे. कित्येक विद्यार्थी फक्त एक वेळच्या जेवणावर आपली उपजीविका भागवत आहेत. समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे.

- आपत्कालीन फंडचा वापर करावा

प्रत्येक विभागात एक इमर्जन्सी फंड असतो त्या फंडचा वापर करण्याचे अधिकार तेथील मुख्य अधिकाऱ्याला असतात. असे असतानाही विद्यार्थ्यांना उपाशी ठेवून त्यांच्यावर अन्याय का केला जात आहे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. याकरिता तत्काळ मेस सुरू करण्यात यावी.

आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकारEducationशिक्षण