शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

वसतिगृहे सुरू, खानावळीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 18:19 IST

समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ : तातडीने मेस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेली वसतिगृहे सुरू झाली आहेत. विद्यार्थी मोठ्या संख्येने वसतिगृहात आलेसुद्धा आहेत. परंतु, वसतिगृहातील मेस (खानावळ) बंद असल्याने विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. तेव्हा शासकीय वसतिगृहातील मेस सुद्धा तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

तब्बल १७ महिन्यांपासून बंद असलेली वसतिगृहे मेडिकल, पॅरामेडिकल तसेच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर गेल्या ४ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला. यात महाविद्यालयातील प्राचार्यांची परवानगी, डबल डोस, आरटीपीसीआर या सर्व अटी टाकण्यात आल्या. सर्व अटींची पूर्तता करून विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी वसतिगृहात प्रवेश केला. वसतिगृह सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांसाठी खानावळीची सोयदेखील समाज कल्याण विभागाद्वारे करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, आठवडा लोटूनसुद्धा विभागाने कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी वारंवार मेस सुरू करण्यासंदर्भात सहायक आयुक्त तसेच उपायुक्त यांना विनंती केली; पण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केराची टोपली दाखविली. कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची समस्या उद्भवली आहे. कित्येक विद्यार्थी फक्त एक वेळच्या जेवणावर आपली उपजीविका भागवत आहेत. समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खानावळी सुरू करण्याचे अद्याप आदेश नसल्याचा हवाला अधिकारी देत आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासापेक्षा दोन वेळचे जेवण हा चिंतेचा विषय झाला आहे.

- आपत्कालीन फंडचा वापर करावा

प्रत्येक विभागात एक इमर्जन्सी फंड असतो त्या फंडचा वापर करण्याचे अधिकार तेथील मुख्य अधिकाऱ्याला असतात. असे असतानाही विद्यार्थ्यांना उपाशी ठेवून त्यांच्यावर अन्याय का केला जात आहे. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. याकरिता तत्काळ मेस सुरू करण्यात यावी.

आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकारEducationशिक्षण