शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इस्पितळांमध्ये हवी ‘क्र ायसिस मॅनेजमेंट समिती’

By admin | Updated: October 14, 2014 00:58 IST

रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवाद कमी झाला आहे. परिणामी रुग्णालयांत ताणतणावाचे प्रसंग वाढले आहेत. यावर उपाय म्हणून इस्पितळांमध्ये ‘क्र ायसिस मॅनेजमेंट समिती’ नेमणे गरजेचे आहे.

नागपूर : रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवाद कमी झाला आहे. परिणामी रुग्णालयांत ताणतणावाचे प्रसंग वाढले आहेत. यावर उपाय म्हणून इस्पितळांमध्ये ‘क्र ायसिस मॅनेजमेंट समिती’ नेमणे गरजेचे आहे. ही समिती रुग्णांशी संवाद साधून उपचाराची माहिती देऊ शकेल, त्यातील धोके, खर्च हेदेखील पारदर्शकपणे सांगू शकेल. यातून तणाव किंवा हल्ल्यांचे प्रसंग कमी होतील,असे मत डॉ. सतीश तिवारी यांनी मांडले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय निमॅकॉन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप राजदेरकर, डॉ. अविनाश वासे, डॉ. राफत खान, डॉ. सरिता उगेमुगे, नागपूर आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. प्रकाश देव आणि डॉ. अर्चना कोठारी आदी उपस्थित होते. डॉ. तिवारी म्हणाले, रुग्ण आणि डॉक्टर यामधील कायदेशीर पद्धतीने मार्ग काढण्यासाठी आयएमए आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने वर्षभरापूर्वी सरकारला मेडिकल ट्रिब्युनल अर्थात वैद्यकीय लवाद स्थापन करण्यासाची शिफारस केली होती. त्याचा प्रस्तावही सादर झाला होता. मात्र, गेल्या वर्षभरात त्यावर एकही बैठक झाली नाही. मनुष्यबळाची कमतरता, तज्ज्ञांची वानवा आणि राजकीय नाकर्तेपणामुळे हा अत्यंत संवेदनशील विषय रेंगाळत पडल्याची चिंताही डॉ. तिवारी यांनी व्यक्त केली. ‘डेथ आॅडिट’ थंडबस्त्यातराज्यातील माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी विविध योजनांसोबतच प्रत्येक मृत्यूची नोंद घेण्यासाठी राज्य सरकारने ‘डेथ आॅडिटचा’ निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्याची योग्य अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे या दोन्ही मृत्यू कमी करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे, माता, बालमृत्यूचा दर कमी करण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडूसारख्या राज्याने महाराष्ट्राला मागे टकले आहे. यात केरळ प्रथम स्थानावर तर महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या लोकसंख्या नियंत्रण फंड कार्यक्र माचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. पी. आर. देव यांनी दिली.