शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा वीरपत्नीचा सन्मान; हर मुश्किल का तेरे पासही हल है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:34 IST

‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले.

ठळक मुद्दे अंजली गद्रे यांनी उंचावले मनोबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. गद्रे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाकरिता कार्य करतात.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) यांच्या पत्नी सुषमा यांचा जागतिक महिला दिवसानिमित्त विदर्भ महिला वकील संघटनेच्यावतीने शुक्रवारी शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी गद्रे यांनी ही कविता सादर केली. संघटनेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. पल्लवी खरे, अध्यक्षा अ‍ॅड. पद्मा चांदेकर, सचिव रितू कालिया व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी राजपूत यांची दोन मुले व दोन नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात पार पडला.राजपूत यांनी २० वर्षे देशसेवा केली. त्यांनी आणखी सेवाकाळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच, आपण प्रत्येकाने या कुटुंबांचा मानसिक आधार झालो पाहिजे असे गद्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.चांदेकर व खरे यांनीदेखील समयोजित विचार व्यक्त केले. याप्रसंगी हायकोर्ट बार असोसिएशन, कामगार न्यायालय वकील संघटना, ग्राहक वकील संघटना, अधिवक्ता परिषद, सहकार न्यायालय वकील संघटना, हायकोर्ट कर्मचारी आदींनीही सुषमा राजपूत यांचा सन्मान केला. जयश्री अलकरी यांनी संचालन केले तर, सुनिता चचोदिया यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सुषमा राजपूत गहिवरल्यासन्मानाला उत्तर देताना सुषमा राजपूत यांना गहिवरून आले. त्यामुळे त्यांना सावरावे लागले. पतीवर फार प्रेम होते. त्यांना आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यावर गर्व आहे. त्यांना आणखी देशाची सेवा करायची होती. जीवनात कधीच घाबरायचे नाही असे ते नेहमीच म्हणत होते. त्यांचे हे शब्द जगण्याचे बळ देतात अशा भावना सुषमा राजपूत यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन