शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागपूर जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’;  बुटीबोरीत झालेल्या डबल मर्डरमागचे कारण उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 21:36 IST

Nagpur News बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देसख्ख्या भावांनीच केला ‘गेम’ २४ तासांत पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

नागपूर : बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वत:ची पत्नी सोडून अगोदरच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावांनीच त्याचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. शेतीच्या कारणावरून अगोदरच भावांमध्ये वाद सुरू होता व त्यातच बदनामीमुळे आगीत तेल ओतल्या गेले.

उत्तम सुरेश बोडखे (३१ वर्षे, बिहाडी, ता. कारंजा घाडगे) आणि सविता गोवर्धन परमार (३८ वर्षे, सोनेगाव मुस्तफा) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये उत्तमचा भाऊ राहुल सुरेश बोडखे (२७), खुशाल सुरेश बोडखे (२९), विजय वसंतराव बोडखे (३०, तिघेही बिहाडी) आणि आकाश अशोक राऊत (२४, कारंजा घाडगे) यांचा समावेश आहे.

वेणा नदीच्या पुलाखाली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तम आणि सविता यांचे मृतदेह आढळून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बुटीबोरी पोलिसांसह जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने (एलसीबी) तपास सुरू केला. एकूण पाच पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले. मृतांचे फोटो सोशल मीडिया आणि माहितीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास मदत झाली.

अटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, बुरीबोरीचे एसएचओ भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे एपीआय अनिल राऊत, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपी भावांचे जमत नव्हते लग्न

सविता परमार विवाहित असून, तिला दोन मुले होती. मात्र, ती पतीपासून वेगळी राहू लागली. उत्तमचेही लग्न झाले होते आणि तोही आपल्या पत्नीला सोडून गेला होता. उत्तम आणि सविता हे बांधकाम कामगार म्हणून काम करत होते आणि बरेच दिवस इसासनी (ता. हिंगणा) येथील भीमनगर झोपडपट्टीत एकत्र राहत होते. त्यामुळे गावात कुटुंबाची बदनामी झाल्याने दोन्ही भाऊ उत्तमवर रागावले होते. सवितापासून दूर होण्याबाबत ते वारंवार उत्तमला सांगत होते.

दोघाही भावांचे लग्नदेखील जमत नव्हते. याशिवाय शेतीच्या वाटणीवरूनदेखील वाद सुरू होता. त्यामुळे दोन्ही भावांनी उत्तमचा काटा काढण्याचे ठरविले होते.

अशी केली हत्या

शेतीचा वाद मिटविण्यासाठी दोन्ही भावांनी उत्तमला ६ जुलै रोजी बिहाडी येथे येण्यास सांगितले. त्याच दिवशी आरोपींनी उत्तमला बाजारगाव येथे गाठले. सोबत आणलेल्या वाहनातच त्यांनी दोघांची हत्या केली. त्यानंतर बुटीबोरी येथे वेणा नदीच्या पुलावर आले व दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHonor Killingऑनर किलिंग