शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 18:38 IST

पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, असा सल्ला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी पोलीस दलाला दिला.

नागपुरातील पोलीस निवासस्थानाच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून वनामतीच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री नितीन राऊत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते. नागपूर विदर्भातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा शुक्रवारी सकाळी गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस जिमखान्यात घेतला. त्यानंतर त्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य आठ पोलीस ठाण्यातील महिला विश्रामगृहाचे उद्घाटन केल्यानंतर ते वनामतीत पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या भाषणातून पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापासून तो समस्यांपर्यंतचा आढावा घेतला.

सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही पोलिसांना नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले.

पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक पोलिसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस दलात भरती होणारा शिपाई उपनिरीक्षक म्हणूनच रिटायर्ड होईल, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरच्या गुन्हेगारीकडे कटाक्ष टाकताना त्यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाकडे लक्ष वेधले. नागपूरचा क्राईम रेट कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी विशद केली. गुन्हा घडल्यानंतर तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याऐवजी गुन्हा घडणारच नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार अतिशय गंभीर आहे. तसे करण्याची कोणी हिंमत करू नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यासाठी समाजात पोलिसांचा आदरयुक्त दरारा असण्याची गरज गृहमंत्र्यांनी विशद केली.

आदरयुक्त दरारा निर्माण करा

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला आदराची आणि न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यासह कायदा आणि सुव्यवस्थेची घडी राखण्यासाठी तुम्ही दक्षता, पण एक काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक संमत करू

महिला अत्याचारासंबंधित शक्ती कायदा विधेयक नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी संयुक्त निवड समितीच्या अहवालावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलCBIगुन्हा अन्वेषण विभागDrugsअमली पदार्थ