शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

होळी उत्सव : नागपुरात १५० हून अधिक जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:41 IST

अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्दे१९ जणांच्या डोळ्यांना दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.गुरुवारी सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मेयो, मेडिकल रुग्णालयात वेगवेगळ्या रंगांचे इन्फेक्शन झालेल्या १९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेडिकलच्या नेत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, होळीच्या दिवशी नऊ रुग्णांच्या डोळ्यांना दुखापत झाली. यातील १६ ते १८ वयोगटातील दोन मुलांच्या डोळ्यावर रंगाचा फुगा फेकून मारल्याने त्यांच्या बुबुळाला दुखापत झाली. या दोघांवर उपचार सुरू आहेत. मेयोच्या नेत्ररोग विभागात रंगामुळे दुखापत झालेल्या रुग्णांची वेगळी नोंद ठेवण्यात आली नाही. परंतु अपघात विभागात दहावर रुग्णांनी उपचार घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मेडिकलच्या अपघात विभागात विविध अपघात, हाणामारीमुळे गंभीर जखमी झालेल्या ९८ तर मेयोमध्ये ५२ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये काही खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मद्यप्राशन करून गाडी चालविताना जखमी झालेल्यांमध्ये आठ जण मेडिकलमध्ये तर पाच जण मेयोमध्ये उपचारासाठी आले होते.पाण्याचा फुगा मारल्याने डोळ्याला दुखापतबालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, धुळवडीच्या दिवशी एका ११ वर्षीय मुलावर त्याच्या मित्राने पाण्याचा फुगा फेकून मारला. हा फुगा त्याच्या डाव्या डोळ्याला लागला. त्याच्या बुबुळाला दुखापत झाली. लागलीच उपचार केल्याने गंभीरता टळली. होळीमध्ये पाण्याचा फुगा लागून जखमी होण्याचे प्रमाण अलिकडे वाढल्याचेही ते म्हणाले.गंभीर अपघात नाहीहोळी व धुळवडीच्या दिवसात चार-पाच किरकोळ अपघातांची नोंद सोडल्यास एकही गंभीर अपघात झालेला नाही. वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.एस. चैतन्यपोलीस उपायुक्त (वाहतूक)

टॅग्स :Holi 2018होळी २०१८nagpurनागपूर