शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

होळी उत्सव : नागपुरात १५० हून अधिक जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:41 IST

अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्दे१९ जणांच्या डोळ्यांना दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.गुरुवारी सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मेयो, मेडिकल रुग्णालयात वेगवेगळ्या रंगांचे इन्फेक्शन झालेल्या १९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेडिकलच्या नेत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, होळीच्या दिवशी नऊ रुग्णांच्या डोळ्यांना दुखापत झाली. यातील १६ ते १८ वयोगटातील दोन मुलांच्या डोळ्यावर रंगाचा फुगा फेकून मारल्याने त्यांच्या बुबुळाला दुखापत झाली. या दोघांवर उपचार सुरू आहेत. मेयोच्या नेत्ररोग विभागात रंगामुळे दुखापत झालेल्या रुग्णांची वेगळी नोंद ठेवण्यात आली नाही. परंतु अपघात विभागात दहावर रुग्णांनी उपचार घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मेडिकलच्या अपघात विभागात विविध अपघात, हाणामारीमुळे गंभीर जखमी झालेल्या ९८ तर मेयोमध्ये ५२ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये काही खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मद्यप्राशन करून गाडी चालविताना जखमी झालेल्यांमध्ये आठ जण मेडिकलमध्ये तर पाच जण मेयोमध्ये उपचारासाठी आले होते.पाण्याचा फुगा मारल्याने डोळ्याला दुखापतबालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, धुळवडीच्या दिवशी एका ११ वर्षीय मुलावर त्याच्या मित्राने पाण्याचा फुगा फेकून मारला. हा फुगा त्याच्या डाव्या डोळ्याला लागला. त्याच्या बुबुळाला दुखापत झाली. लागलीच उपचार केल्याने गंभीरता टळली. होळीमध्ये पाण्याचा फुगा लागून जखमी होण्याचे प्रमाण अलिकडे वाढल्याचेही ते म्हणाले.गंभीर अपघात नाहीहोळी व धुळवडीच्या दिवसात चार-पाच किरकोळ अपघातांची नोंद सोडल्यास एकही गंभीर अपघात झालेला नाही. वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.एस. चैतन्यपोलीस उपायुक्त (वाहतूक)

टॅग्स :Holi 2018होळी २०१८nagpurनागपूर