शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

होळी आली अन् एसटीच्या प्रवाशांची संख्या रोडावली!

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2024 20:49 IST

सोमवारी फेऱ्या कमी : विदर्भातील ट्रॅाफिक मंदावले, मध्य प्रदेशकडे चिक्कार गर्दी.

नागपूर : होळीच्या दिवशी सर्वत्र प्रचंड उत्साह बघायला मिळत असताना विदर्भातील प्रवाशांनी एसटीकडे रविवारी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक बसगाड्या प्रवाशांअभावी रिकाम्या धावत होत्या. तर, दुसरीकडे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर एसटी आणि खासगी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली.

होळीचे पर्व कुठे दोन, कुठे तीन तर काही ठिकाणी सात दिवस साजरे केले जाते. होलिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थात होलिका दहन करण्यापूर्वीपासून रंग लावण्यास सुरूवात होते. लहान मोठे सर्वच उत्साहाने होळीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी पुढे येत असल्याने सर्वत्र उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. या दिवशी व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारी मंडळी आपल्या गावाकडे जाण्यासाठी धावपळ करताना दिसतात. मात्र गाव सोडून या दिवशी दुसऱ्या गावाला जाण्याचे बहुतांश जण टाळतात. त्यामुळे की काय, आज नागपूरहून वर्धा, यवतमाळ, अमरावतीकडे जाणाऱ्या, येणाऱ्या अनेक बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे दिसून येत होते. दुपारपर्यंत किमान १५ ते २० प्रवासी बसमध्ये दिसत होते. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर विदर्भातील विविध मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच घसरली होती. बहुतांश बसमध्ये केवळ ५ ते १० प्रवासीच जात, येत असल्याचे दिसत होते.एसटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिवनी, बालाघाटकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर स्थानकावरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी फेऱ्या कमी करणारसोमवारी रंगोत्सव अर्थात धुळवड आहे. या दिवशी बहुतांश मंडळी घर-मित्रपरिवारात राहून मनसोक्त रंग उधळण्याच्या मनस्थितीत असतात. त्याचा परिणाम प्रवासी संख्या घटण्यावर होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता एसटी महामंडळाने यावेळी धुळवडीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध मार्गावर बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सोडली जाते, त्या मार्गावर सोमवारी सकाळपासून दर ३० मिनटांनी बस सोडण्यात येईल. दुपारी आणि सायंकाळी ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसेल, त्या मार्गावरच बस चालविण्यात येणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर