शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पीक कर्जासाठी मंडळनिहाय मेळावे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:21 IST

कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या प्रकरणाचे निपटारे करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंडळनिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे सावट असले तरी, शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बँकेत, तहसील कार्यालयात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळ स्तरावर पीक कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या प्रकरणाचे निपटारे करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंडळनिहाय पीक कर्ज मेळावे घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक सभापती तापेश्वर वैद्य यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पीक कर्जाच्या संदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत तक्रारी समितीकडे आल्या. शिवाय ग्रामीण भागात कोरोनाची भीती असल्यामुळे तहसील व बँकेत गर्दी टाळण्यासंदर्भातही समिती सदस्यांनी सूचना केल्या. सरकारने केलेल्या कर्जमाफीची प्रकरणे अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी तहसील कार्यालय, बँक एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रकरणांचा निपटारा करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी मंडळनिहाय मेळाव्याची संकल्पना सदस्यांनी मांडली असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या बैठकीत सभापतींनी शेतकऱ्यां ना पाणथळ जमिनीमध्ये जिप्समचा पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहे. बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहचविण्यात येणार आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांची माहिती व तांत्रिक मार्गदर्शनही देण्यात यावे, अशाही सूचना सभापतींनी केल्या. बैठकीला समिती सदस्य प्रीतम कवरे, समीर उमप, सतीश डोंगरे, योगेश देशमुख, मिलिंद सुटे, भोजराज ठवकर, पिंकी कौरती, वृंदा नागपुरे, सुनीता ठाकरे, कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर, कृषी अधिकारी विपिन लोहोट, पंकज लोखंडे, प्रवीण नागरगोजे, अमित डोंगरे, आर. आर. राठोड उपस्थित होते.बोगस बियाण्यांची विक्री थांबविण्यासाठी निगराणी समितीप्रतिबंधित असलेल्या एचटीबीटीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अनाधिकृत कृषी निविष्ठा प्रतिबंध निगराणी समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विक्री केंद्रामध्ये तक्रारीसंदर्भात टोल फ्री क्रमांक व कृषी अधिकारी, मोहीम अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नोटीस बोर्डवर लावण्याच्या सूचना दिल्या आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी