शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

अवघ्या ५० लाखांसाठी राज्यातील एचआयव्हीबाधितांचा टांगला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 10:30 AM

‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबईत जावे लागते. वर्ष होऊनही केवळ ५० लाखांचे हे उपकरण अद्यापही खरेदी झालेले नाही. अनेक एचआयव्हीबाधित या तपासणीसाठी मुंबईला जात नसल्याचे सामोर आले आहे.

ठळक मुद्देमंजुरीनंतरही वर्षभरापासून ‘व्हायरल लोड’ यंत्राची प्रतीक्षाविदर्भातील बाधितांना गाठावे लागते मुंबई

सुमेध वाघमारे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबईत जावे लागते. नागपुरात ही सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘एआरटी’सेंटरसाठी ‘व्हायरल लोड’ उपकरणाला मंजुरी देण्यात आली. मात्र वर्ष होऊनही केवळ ५० लाखांचे हे उपकरण अद्यापही खरेदी झालेले नाही. धक्कादायक म्हणजे, अनेक एचआयव्हीबाधित या तपासणीसाठी मुंबईला जात नसल्याचे सामोर आले आहे. यांची संख्या प्रत्येक केंद्रावर साधारण ५० टक्के असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.एचआयव्हीबाधितांना वेळेत उपचार व्हावेत , यासाठी सरकारने २००५ मध्ये ‘एआरटी’ सेंटर सुरू केले. ज्या बाधितांना ‘एआरटी’चे रेजिस्टंट झाले आहे त्यांच्यासाठी ‘सेकंड लाईन’ उपचारपद्धती नागपुरात २०११ पासून सुरू झाली. आता ही उपचारपद्धती यवतमाळ आणि अकोला येथेही सुरू आहे. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणारा रु ग्ण आधीच शरीराने व मनाने खचलेला असतो. उपचारासोबत त्याला मानसिक आधार देणे गरजेचे असते.प्रतिकार शक्तीच नसल्याने अशा रु ग्णांना कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होण्याची भीती असते. अशावेळी औषधांचा प्रतिरोध झाल्यास रु णाच्या रक्तातील ‘सीडी फोर’ मोजले जाते, मात्र रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यासाठी शासनाकडून कुठलीही सवलत दिली जात नाही. आधीच रुग्णाची प्रकृती खालवली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपत नाही. विशेष म्हणजे सेंकड लाईनच्या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबईला जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्ण जाण्याचे टाळतात. या शिवाय मुंबईतल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर रिपोर्ट मिळण्यासही उशीर होत असल्याने उपचारातही उशीर होतो.

वर्षभरापूर्वीच ‘नॅको’ने दिली मंजुरीमिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) नागपूरच्या मेडिकलमधील एआरटी सेंटरसाठी सुमारे ५० लाखांचे ‘व्हायरल लोड’ यंत्र खरेदी करण्याला मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून हे यंत्र खरेदी होणार होते. परंतु नंतर काय झाले याचे कुणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे, या यंत्रासोबत तंत्रज्ञ, स्वतंत्र वातानुकूलित जागेचीही गरज असून ती कोण सोडविणार हाही प्रश्न आहे.

५० टक्के रुग्ण ‘व्हायरल लोड’पासून वंचित‘सेकंड लाईन’ उपचार पद्धती सुरू असलेल्या ‘एआरटी’केंद्राच्या एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, रजिस्टर झालेल्या बाधितांचे समुपदेशन केल्यानंतरही ते ‘व्हायरल लोड’ साठी मुंबईत जात नाही. अशा रुग्णांकडून आम्ही लेखी लिहून घेतो. यांची संख्या सुमारे ५० टक्के आहे.

नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन आवश्यकमेडिकलच्या एआरटी केंद्रावर सेकंड लाईन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच एचआयव्हीबाधितांना दर सहा महिन्यातून रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी (व्हायरल लोड) मुंबईला जावे लागते. अनेकांना हा प्रवास व प्रवसाचा खर्च, तेथे राहण्याचा खर्च झेपत नाही. अनेकांना याचे महत्त्व सांगूनही जात नाही. अशा रुग्णांच्या जीवाला धोका संभावतो. यामुळे नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे आहे.-बबिता सोनीअध्यक्ष, संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्था

टॅग्स :Healthआरोग्य