शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

इतिहासाच्या संवर्धनाला हेरिटेजचा अडसर

By admin | Updated: May 9, 2014 02:17 IST

नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले.

मंगेश व्यवहारे ■ नागपूरनागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी राजधानी व महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळाला. मात्र, नागपूरचे प्रशासन राजाचा सन्मान करू शकले नाही. आज राज्याच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीचे संरक्षण व्हावे म्हणून भोसले घराणे प्रयत्नरत आहे. मात्र हेरिटेजचा अडसर असल्याने, या समाधींचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकत नाही. भोसले राजघराण्याचे स्वत:चे घाट आहे. त्याला राजघाट संबोधण्यात येते. या राजघाटावर भोसले घराण्यातील राणी काशीबाई सती गेल्या होत्या. त्यांचे समाधी मंदिर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे राजघाट काशीबाई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.नवसाला पावतात म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. या राजघाटावर राजे रघुजी प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांच्या राण्या, भोसले घराण्याचे खासमखास असलेल्या लोकांची समाधी आहे. या समाध्यांचे बांधकाम अतिशय जुने आहे. त्यामुळे राजघाट परिसराची नोंद हेरिटेजमध्ये करण्यात आली आहे. राजघाट हा भोसल्यांच्या मालकीच्या जागेवर असला तरी, हेरिटेजमध्ये आल्याने त्यांचे रक्षण ते करू शकत नाही.नागपूर महापालिकेंतर्गत येणार्‍या जुन्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली होती. मात्र हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून या स्थळांचा कुठलीही विकास करण्यात आला नाही. राजघाटातील सर्व समाधींचे बांधकाम पुरातन पद्धतीचे आहे. ते जीर्ण झाले आहे. काही समाध्या खचलेल्या आहे, तुटलेल्या आहे. भोसले घराण्याचे वंशज समाधीच्या दुरस्तीला तयार असले तरी, बांधकाम करायचे असेल तर हेरिटेज कमिटीची परवानगी आवश्यक आहे.मात्र शहरात हेरिटेज कमिटीच अस्तित्वात नसल्याने, ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. मनपाच्या नगररचना विभागात हेरिटेज समितीच्या संदर्भात विचारणा केली असता, काही वर्षांपूर्वी ही समिती बरखास्त झाली असल्याचे सांगण्यात आले.

पर्यटन क्षेत्र होईल यादृष्टीने प्रयत्न करावेया स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याचे अस्तित्व जपले पाहिजे. लोकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून या स्थळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे स्थळ पर्यटन क्षेत्र होईल, यादृष्टीने मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.दत्ता शिर्के, सचिव, युवा चेतना मंच मालक असूनही संरक्षणापासून वंचितराजघाट हे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आहे. या घाटावर भोसले घराण्याचे सर्व राजा, राणी यांच्या समाधी आहेत. बांधकामही जुन्या पद्धतीचे असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भोसले घराणे या जागेचा आजही टॅक्स भरतात; मात्र विकास करू शकत नाही. आज या घाटाला संरक्षण भिंत नाही. घाटाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अवैध कामे येथे होतात. हेरिटेज कमिट्या निव्वळ नावापुरत्या असून, त्यांच्यामुळेच नागपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत आहे.राजे मुधोजी भोसले, भोसलेंचे १३ वे वंशज