शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वेळाहरी बाहुलीविहीर; ऐतिहासिक वारसा जाणार अतिक्रमणाच्या घशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:39 IST

नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या वेळाहरी या गावात दोनशे वर्षे जुनी भोसलेकालीन बाहुलीविहीर आहे. मात्र, याकडे ना पुरातत्त्व विभागाचे ना पर्यटन विभागाचे लक्ष आहे. अशीच स्थिती राहिली तर ही पुरातन विहीर केवळ दंतकथांमध्येच रममाण असणार आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व, पर्यटक विभागाच्या प्रतीक्षेत ऐतिहासिक स्थळअमेरिकनांना आकर्षण असलेल्या स्थळाची स्थानिक संस्थांकडून उपेक्षा

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नाठाळांच्या हवाली रत्ने बहुरूप, चोरून नेणे ठरती सद्गुण’अशीच स्थिती शहरातील वारसा स्थळांची झाली आहे. आपल्याकडील ऐतिहासिक वारसा स्थळांची आपल्याकडूनच होत असलेली उपेक्षा आपल्याच पथ्यावर कशी पडते, याचे हे प्रमुख उदाहरण होय. शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या वेळाहरी या गावात दोनशे वर्षे जुनी भोसलेकालीन बाहुलीविहीर आहे. मात्र, याकडे ना पुरातत्त्व विभागाचे ना पर्यटन विभागाचे लक्ष आहे. अशीच स्थिती राहिली तर आज मोडक्या-तोडक्या अवस्थेत किमान दिसत असलेली ही पुरातन विहीर केवळ दंतकथांमध्येच रममाण असणार आहे.

बेसा स्वामिधाम मंदिराच्या मार्गावरून थेट आऊटर रिंगरोडवर वेळा (हरिश्चंद्र) हे ऐतिहासिक गाव आहे. रिंगरोड पार केले की लागलीच ही बाहुलीविहीर लागते. अगदी समारोसमोर मोक्षधाम घाट आहे तर पुढे दोन किलोमीटर अंतरावर पुरातन श्री बिनशिरा टुंडा मारुती मंदिर आहे. या बाहुलिविहिरीच्या अभ्यासाठी अधामधात वास्तुविशारद शास्त्राचे अभ्यासक येत असतात.

विशेष म्हणजे, अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथील अलबामा विद्यापीठाच्या कला इतिहासतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. कॅथलिन कमिंग्स गेल्या चार वर्षांपासून अभ्यासासाठी येथे येत आहेत. त्यांना भोसलेकालीन वारसा स्थळांविषयी प्रचंड आस्था असून, विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर ते येथे येत असतात. या वारसा स्थळाची नोंद अलबामा विद्यापीठ घेऊ शकते. मात्र, नागपुरातील विद्यापीठाला हे स्थळ ठाऊक आहे का, हे सांगणे कठीण. एवढेच नव्हे तर वारसा स्थळांची निगा राखणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचेही इकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. शासकीय संस्थांकडून होत असलेल्या या उपेक्षेमुळे येथे अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. सध्या हे वारसास्थळ खासगी मालमत्तेत येत असल्याचे दिसून येते.धनाच्या शोधासाठी लागली होती रीघ: चार-पाच वर्षापूर्वी याच बाहुलीविहिरीच्या आत मोठे धन साठवले आहे, अशा धारणेने बरेच लोक रात्रीच्या वेळेस येथे खोदकाम करत असत. गावातील लोकांना ही बाब कळताच आरडाओरड केल्यावर ते पळून जात असत, अशी माहिती गावातील काही लोक देतात.दोनशे वर्षे जुनीही बाहुलीविहीर दोनशे वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. कुणी बांधली, याची माहितीही मिळत नाही. ही विहीर जमिनीखाली दोन मजली इतकी आहे. सध्या पावसाळ्यामुळे ही विहीर पाण्याने तुडुंब आहे. दरवाजावर महिरप, भिंतींवर मूर्ती सुरेख आहेत. विहिरीतील पाणी निकासीसाठी मोटची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे मुख्य विहिरीला लागून तेथेच बाजूला जलतरणाची व्यवस्था आहे. कपडे बदलण्यासाठी विशेष खोली आहे. मात्र, आता ही विहीर मोडकळीस आलेली दिसते.वारसा माहीत नाही म्हणून जपवणूक होत नाही. पुणे, कोकण येथील वारसास्थळे दाखवली आणि त्यांची निगा राखली म्हणजे महाराष्ट्र धर्म साधला अशी मानसिकता आहे. मात्र, आपल्याकडील अनेक वारसास्थळे इतिहासाची साक्ष देतात. विदेशी विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. मात्र, आपल्याकडूनच या स्थळांची उपेक्षा होत आहे.- डॉ. शेषशयन देशमुख (ज्येष्ठ भारतीय विद्या अभ्यासक) 

 

टॅग्स :historyइतिहास