शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली

By निशांत वानखेडे | Updated: February 28, 2025 18:03 IST

जेएनयुच्या कुलगुरू शांतीश्री पंडित : व्हीएनआयटीमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर परिषद सुरू

नागपूर : आध्यात्माची जाेड असलेली भारतीय ज्ञान परंपरा व सभ्यता जगात सर्वश्रेष्ठ आहे. मात्र आक्रमणकारी माेघलांनी व नंतर ब्रिटीशांनी आपला समृद्ध असा इतिहास झाकून ज्ञान विज्ञानाची माेडताेड केली व पुढे असभ्य म्हणून प्रचारीत केले. दुर्देवाने स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षात पाश्चात्य प्रभावित राजसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या इतिहासकारांनीही या ज्ञान परंपरेला कलुशितच केले, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या कुलगुरू डाॅ. शांतिश्री धुलीपूडी पंडित यांनी केली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) च्यावतीने आयाेजित ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ विषयावरील दाेन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या बाेर्ड ऑफ गव्हर्नन्सचे चेअरमन माडाभूषी मदन गाेपाल, संचालक प्रा. प्रेम लाल पटेल प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. शांतिश्री पंडित यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावातील राजसत्तेत भारतीय इतिहसाचे सत्य मांडणाऱ्या आर.सी. मजुमदार यांच्यासारख्या इतिहासकारांना बाजुला सारण्यात आल्याची टीका केली. त्याऐवजी असत्याचा प्रचार करणाऱ्या पाश्चात्य प्रभावातील इतिहासकारांना पुढे आणण्यात आले. त्यांनी आपल्या प्रचारतंत्राने भारतीय वारसा निम्न लेखून आक्रमणकारी शक्तिंच्या धर्म संस्कृतीला चमकविण्याचे काम केले. भारताचा समृद्ध इतिहास झाकण्यात आला.

या इतिहासकारांनी पुढे भारतीय असंस्कृत व असभ्य असल्याचाच प्रचार केला. माेघलांमुळे संस्कृती आली व ब्रिटीशांमुळे सभ्यता आणि लाेकशाही मिळाली, असा बनावट प्रचार करण्यात आला. आर्य बाहेरून आले व ब्राम्हणांवर समाजात दुफळी निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, नायजेरियामध्येही ब्रिटीशांचे राज्य हाेते, मग तिथे लाेकशाही का रुजली नाही, असा सवाल त्यांनी केला. वास्तविकतेत भारतात १०,००० वर्षापासून सभ्यता असल्याचे कार्बन डेटिंगवरून आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला नाही, तर भारताने त्यांना लाेकशाही व सभ्यता शिकविली, असे मत डाॅ. पंडित यांनी व्यक्त केले.

औरंगजेबाचे गाेडवे, संभाजी महाराज झाकलेइतिहासकारांनी कायमच आक्रमणकारींचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना क्रुरपणे मारले, त्या औरंगजेबाचे धर्मनिरपेक्ष, दयाळू म्हणून इतिहासात वर्णन करण्यात आले आणि संभाजी महाराजांना इतिहासातूनच गायब करण्यात आल्याची टीका डाॅ. पंडित यांनी केली. भारताच समृद्ध वारसाच इतिहासातून गाळण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

स्त्रिवाद आम्हाला शिकवू नयेसरस्वती, महालक्ष्मी, दुर्गा, पार्वती या स्त्री देवतांना भारतीय पूजत आले आहेत. स्वत: भगवान शंकरांना अर्धनारीश्वर मानले जाते. लक्ष्मीपती, सीतापती, उमापती, राधाकृष्ण असा पुरुष देवतांचा उल्लेख पत्नीच्या नावाने हाेताे. त्यामुळे पाश्चात्यांनी आम्हाला स्त्रीवाद शिकवू नये, असे डाॅ. पंडित म्हणाल्या. 

ख्रिश्चन, मुस्लिमांप्रमाणे हिंदू एका देवावर अवलंबून नाहीतख्रिश्चन, मुस्लिम एकाच देवावर अवलंबून आहेत. त्यांच्याकडे एकच पर्याय आहे. हिंदूकडे ईश्वराचे अनेक पर्याय आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भारत सर्वसमावेशकता व विविधता साजरा करणारा देश आहे. आमचा धर्म हा कर्मकांड नाही तर जगण्याचा मार्ग आहे, म्हणून आमच्यात लाेकशाही मजबूत आहे, असे मतही त्यांनी मांडले.

ज्ञान, तंत्रज्ञानातही श्रेष्ठजगात कुठेही नव्हते तेव्हा ब्रहधिश्वरा मंदिर, मीनाक्षी मंदिर आदी मंदिरांचे आर्किटेक्ट भारताकडे हाेते. ताजमहाल आश्चर्य नाही तर ही मंदिरे आश्चर्य व सर्वश्रेष्ठ आर्किटेक्टचा नमुना आहेत. आमच्याकडे धातुंचे, अधातुंचे ज्ञान हाेते, चुंबकीय शक्तिची माहिती हाेती. आर्यभट्ट, भास्कराचार्य, रामानुजमसारखे श्रेष्ठ गणितज्ज्ञ, खगाेलतज्ज्ञ, शंकराचार्यासारखे तत्वज्ञ व सुश्रुतासारखे शस्त्रक्रियेचे ज्ञान असलेले वैद्यकीय तज्ज्ञही हाेते. संस्कृत वेद, उपनिषदात हे ज्ञान आजही शाबूत आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या शिक्षकांनी हे ज्ञान विविध भारतीय भाषांमध्ये आणावे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, असे आवाहन डाॅ. शांतिश्री पंडित यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर