शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चात्य प्रभावाच्या इतिहासकारांनी भारतीय ज्ञान परंपरा कलुशित केली

By निशांत वानखेडे | Updated: February 28, 2025 18:03 IST

जेएनयुच्या कुलगुरू शांतीश्री पंडित : व्हीएनआयटीमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’वर परिषद सुरू

नागपूर : आध्यात्माची जाेड असलेली भारतीय ज्ञान परंपरा व सभ्यता जगात सर्वश्रेष्ठ आहे. मात्र आक्रमणकारी माेघलांनी व नंतर ब्रिटीशांनी आपला समृद्ध असा इतिहास झाकून ज्ञान विज्ञानाची माेडताेड केली व पुढे असभ्य म्हणून प्रचारीत केले. दुर्देवाने स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षात पाश्चात्य प्रभावित राजसत्तेच्या प्रभावाखाली असलेल्या इतिहासकारांनीही या ज्ञान परंपरेला कलुशितच केले, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या कुलगुरू डाॅ. शांतिश्री धुलीपूडी पंडित यांनी केली.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) च्यावतीने आयाेजित ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ विषयावरील दाेन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या बाेर्ड ऑफ गव्हर्नन्सचे चेअरमन माडाभूषी मदन गाेपाल, संचालक प्रा. प्रेम लाल पटेल प्रामुख्याने उपस्थित हाेते. डाॅ. शांतिश्री पंडित यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावातील राजसत्तेत भारतीय इतिहसाचे सत्य मांडणाऱ्या आर.सी. मजुमदार यांच्यासारख्या इतिहासकारांना बाजुला सारण्यात आल्याची टीका केली. त्याऐवजी असत्याचा प्रचार करणाऱ्या पाश्चात्य प्रभावातील इतिहासकारांना पुढे आणण्यात आले. त्यांनी आपल्या प्रचारतंत्राने भारतीय वारसा निम्न लेखून आक्रमणकारी शक्तिंच्या धर्म संस्कृतीला चमकविण्याचे काम केले. भारताचा समृद्ध इतिहास झाकण्यात आला.

या इतिहासकारांनी पुढे भारतीय असंस्कृत व असभ्य असल्याचाच प्रचार केला. माेघलांमुळे संस्कृती आली व ब्रिटीशांमुळे सभ्यता आणि लाेकशाही मिळाली, असा बनावट प्रचार करण्यात आला. आर्य बाहेरून आले व ब्राम्हणांवर समाजात दुफळी निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, नायजेरियामध्येही ब्रिटीशांचे राज्य हाेते, मग तिथे लाेकशाही का रुजली नाही, असा सवाल त्यांनी केला. वास्तविकतेत भारतात १०,००० वर्षापासून सभ्यता असल्याचे कार्बन डेटिंगवरून आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला नाही, तर भारताने त्यांना लाेकशाही व सभ्यता शिकविली, असे मत डाॅ. पंडित यांनी व्यक्त केले.

औरंगजेबाचे गाेडवे, संभाजी महाराज झाकलेइतिहासकारांनी कायमच आक्रमणकारींचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना क्रुरपणे मारले, त्या औरंगजेबाचे धर्मनिरपेक्ष, दयाळू म्हणून इतिहासात वर्णन करण्यात आले आणि संभाजी महाराजांना इतिहासातूनच गायब करण्यात आल्याची टीका डाॅ. पंडित यांनी केली. भारताच समृद्ध वारसाच इतिहासातून गाळण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

स्त्रिवाद आम्हाला शिकवू नयेसरस्वती, महालक्ष्मी, दुर्गा, पार्वती या स्त्री देवतांना भारतीय पूजत आले आहेत. स्वत: भगवान शंकरांना अर्धनारीश्वर मानले जाते. लक्ष्मीपती, सीतापती, उमापती, राधाकृष्ण असा पुरुष देवतांचा उल्लेख पत्नीच्या नावाने हाेताे. त्यामुळे पाश्चात्यांनी आम्हाला स्त्रीवाद शिकवू नये, असे डाॅ. पंडित म्हणाल्या. 

ख्रिश्चन, मुस्लिमांप्रमाणे हिंदू एका देवावर अवलंबून नाहीतख्रिश्चन, मुस्लिम एकाच देवावर अवलंबून आहेत. त्यांच्याकडे एकच पर्याय आहे. हिंदूकडे ईश्वराचे अनेक पर्याय आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भारत सर्वसमावेशकता व विविधता साजरा करणारा देश आहे. आमचा धर्म हा कर्मकांड नाही तर जगण्याचा मार्ग आहे, म्हणून आमच्यात लाेकशाही मजबूत आहे, असे मतही त्यांनी मांडले.

ज्ञान, तंत्रज्ञानातही श्रेष्ठजगात कुठेही नव्हते तेव्हा ब्रहधिश्वरा मंदिर, मीनाक्षी मंदिर आदी मंदिरांचे आर्किटेक्ट भारताकडे हाेते. ताजमहाल आश्चर्य नाही तर ही मंदिरे आश्चर्य व सर्वश्रेष्ठ आर्किटेक्टचा नमुना आहेत. आमच्याकडे धातुंचे, अधातुंचे ज्ञान हाेते, चुंबकीय शक्तिची माहिती हाेती. आर्यभट्ट, भास्कराचार्य, रामानुजमसारखे श्रेष्ठ गणितज्ज्ञ, खगाेलतज्ज्ञ, शंकराचार्यासारखे तत्वज्ञ व सुश्रुतासारखे शस्त्रक्रियेचे ज्ञान असलेले वैद्यकीय तज्ज्ञही हाेते. संस्कृत वेद, उपनिषदात हे ज्ञान आजही शाबूत आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या शिक्षकांनी हे ज्ञान विविध भारतीय भाषांमध्ये आणावे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, असे आवाहन डाॅ. शांतिश्री पंडित यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर