शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हिंगणघाट प्रकरण ;  राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी  : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:47 IST

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. सरकारतर्फे पीडितेला वाचवण्याचे सर्व प्रयत्न झाले. नागपूर तसेच मुंबईतील डॉक्टरांनीदेखील प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने अपयश आले. जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा-नितीन गडकरीकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी म्हणाले, हिंगणघाट येथील जळीत घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासनाने युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा, अशी कारवाई करावी. सात दिवस या युवतीने मृत्यूशी झुंज दिली. महिलांवर होणाऱ्या अशा घटनांविरोधात कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. कायद्याच्या भीतीमुळेच या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेबाबत महाराष्ट्र शासन गंभीर दखल घेईल,असेही ते म्हणाले.

अत्यंत दु:खद घटना -डॉ विकास महात्मेखा. डॉ. विकास महात्मे म्हणाले, हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. ही अत्यंत दु:खद घटना आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलावे. मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.

कठोर शिक्षेसाठी निश्चितच प्रयत्न -नितीन राऊतऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या निधनाच्या बातमीने समस्त महाराष्ट्राला जबर धक्का बसला आहे. पीडितेने अतिशय जिकिरीने मृत्यूशी झुंज दिली, पण नियतीपुढे आपण सारे हतबल आहोत. तिला यातना देणाºया आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा द्यावी, यासाठी राज्य सरकार निश्चितच प्रयत्न करेल. यापुढे राज्यात अशी घटना घडू नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.

आरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : चंद्रशेखर बावनकुळेहिंगणघाट येथील जळीतकांडातील आरोपीला महिनाभरात कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले, अशा घटनांची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कडक कायदा करण्यात यावा. पीडित कुटुंबातील व्यक्तीला शासनाने नोकरी द्यावी आणि आर्थिक मदतही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मानवतेला काळिमा फासणारी घटना : प्रकाश गजभियेआ. प्रकाश गजभिये म्हणाले, हिंगणघाट येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. अशा घटना पुढे होणार नाही, यासाठी सरकार विशेष पाऊल उचलणार आहे. तरुणींनी कुठल्याही छेडखानीला न घाबरता पालकांना सांगून पोलिसात तक्रार करावी, यामुळे अशा घटनांना आळा बसेल.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटDeathमृत्यू