शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कट्टर हिंदुत्वाच्या संकल्पनेत पंतप्रधान मोदी केवळ एक प्यादे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:22 IST

राष्ट्रीय  स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत.

ठळक मुद्देसंघ ही बौद्धिक झोंबी निर्माण करणारी संस्था : हरतोश बल यांचा घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :राष्ट्रीय  स्वयंसेवक संघा(आरएसएस)च्या स्थापनेपासूनचा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा आजही कायम आहे व वेळोवेळी कृती बदलून त्यावर काम केले जाते. विचारसरणी देशासाठी घातक असून विषमतेला खतपाणी घालणारी आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक प्यादे आहेत. कदाचित भविष्यात त्यांच्यापेक्षा कट्टर व्यक्ती पदावर येईल तेव्हा देशातील संविधानिक संस्था वाचविण्यास वेळही मिळणार नाही. सध्या या संस्था टिकून आहेत व ही संधी आहे. त्यामुळे संघ विचारांपासून वेळीच सावध व्हा, असे आवाहन कॅरावान पत्रिकेचे संपादक हरतोश सिंह बल यांनी केले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुजन संघर्ष समिती, भारिप, मराठा सेवा संघ, सत्यशोधक समाज, संभाजी ब्रिगेड व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे आयोजित प्राचार्य या. वा. वडस्कर स्मृती व्याख्यानात हरतोश सिंह बोलत होते. न्यायमूर्ती लोया यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण बल यांनीच उघडकीस आणले होते़ त्यांनी संघाच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिखित ‘बंच आॅफ थॉट’मधील विचारच संघाचे तत्त्वज्ञान आहे़ मुस्लीम व ख्रिश्चन हिंदू राष्टÑाचा भाग नाहीत आणि सिख, बौद्ध व इतर अल्पसंख्यकांना सांप्रदायिक ठरविणे ही संघाची मूळ भावना आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील मुस्लीम आणि दलितांवरील हल्ले वाढले असून, लोकशाहीच्या संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. माध्यमांवर दबाव आणि न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ वाढली. स्वयंसेवी संस्थांना दाबले जात आहे़ स्पष्ट बोलत नसले तरी संघाचा आरक्षणाला विरोध आहे़ महात्मा गांधी मुस्लिमांचे लाड पुरवितात, असे गोळवलकर म्हणायचे़ गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका संशयास्पद आहे. संघाने आपली विचारधारा रुजविण्यासाठी सेवेचा बुरखा पांघरला असून, त्या माध्यमातून लोकांना हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे परिवर्तित करण्याचे काम विविध संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे. अण्णा हजारे, योगगुरू रामदेवबाबा यांच्या आंदोलनामागेही संघ असल्याचा आरोप करीत संघ ही चर्चेस तयार न होणारे ‘बौद्धिक झोंबी’ निर्माण करणारी संस्था असल्याचे टीकास्त्र बल यांनी सोडले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व राष्ट्रीय ओबीसी मंचचे संयोजक डॉ़ बबनराव तायवाडे, प्रभारी प्राचार्य पी़ एस़ चंगोले, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, प्रा़ विशाखा वडस्कर, मिलिंद पखाले, आऱ एस़ मोटघरे, अ‍ॅड. आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूरHinduहिंदू