शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 07, 2024 7:04 PM

Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली

नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली व न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी कठेरिया यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन आवश्यक आदेश देण्यासाठी या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली.

गैरवर्तणुकीच्या कारणावरून पीएच.डी. उमेदवारी रद्द करून विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारल्या गेल्यामुळे पीडित विद्यार्थी निरंजनकुमार प्रसाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ९ फेब्रुवारी रोजी कुलसचिवांना नोटीस बजावून याचिकेवर १६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ती नोटीस कुलसचिवांना तामील झाली होती. असे असतानाही १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे कोणीच न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देऊन संशोधन कार्य करू देणे आवश्यक होते. परंतु, प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात आला नाही. करिता, न्यायालयाने २३ एप्रिल रोजी कुलसचिव काथेरिया यांना अवमान नोटीस बजावली व २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काथेरिया २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर झाले, पण त्यांच्या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानाचे दोषारोप निश्चित केले व त्यावर योग्य भूमिका मांडण्यास सांगितले. त्यानुसार, कठेरिया यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाच्या आदेशाचा जाणिवपूर्वक अवमान केला नाही. अनवधानाने चुक झाली आहे. प्रसाद यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ