शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी - उल्हास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या ...

ठळक मुद्देहिंदी दिवस :राष्ट्रभाषा सभाकडून साहित्यिकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या देशात आजही हिंदीचे महत्त्व मोठे आहे. ही भाषा देशाची राष्ट्रभाषा व्हावी आणि देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी, असे मनोगत महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेच्या नागपूर विभागाच्यावतीने स्थानिक धनवटे सभागृहात शनिवारी हिंदी दिवस तथा भारतीय भाषा दिनानिमित्त विविध भाषांमधून आपला ठसा उमटविणाऱ्या आठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष अजय पाटील, आयोजक जगदीश जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान आशा पांडे (बहुभाषिक लेखिका), डॉ. वंदना खुशलानी (हिंदी), डॉ. प्रकाश खरात (मराठी), डॉ. अजहर हयात (उर्दू), मंदिरा गांगुली (बांगला), एस. प्रभुरामन् (तामिळ), कुसूम पटोरिया (संस्कृ त) यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विनोद आसुदानी (सिंधी साहित्य) अनुपस्थित होते.यावेळी उल्हास पवार म्हणाले, अलीकडे लोकशाहीमध्ये भाषिक अस्मिता अधिक तीव्र व्हायला लागल्या आहेत. असे असले तरी हिंदीचे स्थान सर्वत्र कायम आहे. ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त के ले. बहुभाषिकत्वामधून हिंदी अधिक सशक्त होईल, ही विनोबा भावे यांची धारणा होती. तर अन्य सर्व भाषांव्यतिरिक्त पाश्चिमात्य ही एक भाषा असावी, असे महात्मा गांधी यांचे मत होते.डॉ. गिरीश गांधी म्हणाले, भाषांप्रति आजही देशात तीव्रता असली तरी एका भाषेचे एकच राष्ट्र असणे शक्य नाही. देशातील सांस्कृतिक भिन्नता लक्षात घ्यावी लागेल. अन्य भाषांच्या समृद्धीशिवाय हिंदी समृद्ध होणे शक्य नाही. हिंदीला राजाश्रय मिळावा, भाषांतरातून हिंदी समृद्ध व्हावी.सत्कारानंतर डॉ. प्रकाश खरात, वंदना खुशलानी आणि आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त के ले. संचालन मनोज पांडेय यांनी तर उपस्थितांचे आभार अजय पाटील यांनी मानले.

टॅग्स :hindiहिंदीnagpurनागपूर