शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी - उल्हास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या ...

ठळक मुद्देहिंदी दिवस :राष्ट्रभाषा सभाकडून साहित्यिकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या देशात आजही हिंदीचे महत्त्व मोठे आहे. ही भाषा देशाची राष्ट्रभाषा व्हावी आणि देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी, असे मनोगत महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेच्या नागपूर विभागाच्यावतीने स्थानिक धनवटे सभागृहात शनिवारी हिंदी दिवस तथा भारतीय भाषा दिनानिमित्त विविध भाषांमधून आपला ठसा उमटविणाऱ्या आठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष अजय पाटील, आयोजक जगदीश जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान आशा पांडे (बहुभाषिक लेखिका), डॉ. वंदना खुशलानी (हिंदी), डॉ. प्रकाश खरात (मराठी), डॉ. अजहर हयात (उर्दू), मंदिरा गांगुली (बांगला), एस. प्रभुरामन् (तामिळ), कुसूम पटोरिया (संस्कृ त) यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विनोद आसुदानी (सिंधी साहित्य) अनुपस्थित होते.यावेळी उल्हास पवार म्हणाले, अलीकडे लोकशाहीमध्ये भाषिक अस्मिता अधिक तीव्र व्हायला लागल्या आहेत. असे असले तरी हिंदीचे स्थान सर्वत्र कायम आहे. ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त के ले. बहुभाषिकत्वामधून हिंदी अधिक सशक्त होईल, ही विनोबा भावे यांची धारणा होती. तर अन्य सर्व भाषांव्यतिरिक्त पाश्चिमात्य ही एक भाषा असावी, असे महात्मा गांधी यांचे मत होते.डॉ. गिरीश गांधी म्हणाले, भाषांप्रति आजही देशात तीव्रता असली तरी एका भाषेचे एकच राष्ट्र असणे शक्य नाही. देशातील सांस्कृतिक भिन्नता लक्षात घ्यावी लागेल. अन्य भाषांच्या समृद्धीशिवाय हिंदी समृद्ध होणे शक्य नाही. हिंदीला राजाश्रय मिळावा, भाषांतरातून हिंदी समृद्ध व्हावी.सत्कारानंतर डॉ. प्रकाश खरात, वंदना खुशलानी आणि आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त के ले. संचालन मनोज पांडेय यांनी तर उपस्थितांचे आभार अजय पाटील यांनी मानले.

टॅग्स :hindiहिंदीnagpurनागपूर