शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: March 22, 2024 17:53 IST

राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नागपूर : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग चांगले झाले असले तरी वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही प्रकारच्या महामार्गांवर मागील १४ महिन्यांत १९ हजारांहून अधिक अपघात झाले व त्यात सव्वा दहा हजारांहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयात या अपघातांबाबत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०२३ साली राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८५९ अपघात झाले व त्यात ५ हजार ६८१ जणांचे मृत्यू झाले. तर राज्य महामार्गांवर ६ हजार ४० अपघातांत ३ हजार १८१ जणांचे जीव गेले. तर जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर १ हजार ८१८ अपघातांत ९०० जणांचा बळी गेला व राज्य महामार्गांवरील ९८४ अपघातांमध्ये ५१८ जणांना जीव गमवावा लागला. या १४ महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ७०१ अपघात झाले व १० हजार २८० नागरिकांचा मृत्यू झाला.बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करुन वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.

चार शहरांच्या अंतर्गतच १,४५५ मृत्यूनागपूर , मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर या चार शहरांच्याअंतर्गत असलेल्या महामार्गांवर १४ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ४९७ अपघात झाले. त्यात १ हजार ४५५ जणांचा मृत्यू झाला.

‘कार’ सर्वात धोकादायक

२०१९ ते २०२२ या कालावधीत महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात कारचे झाले आहेत. या कालावधीत १७ हजार ८०२ कारचे अपघात झाले व त्यात ७ हजार ५१५ जणांचा जीव गेला. ट्रकचे ६ हजार ४५१ अपघात झाला व २ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला. तर बसमुळे २ हजार २९५ अपघात झाले व ५६३ जणांना जीव गमवावा लागला.

वर्षनिहाय अपघातवर्ष : अपघात (राष्ट्रीय महामार्ग) : मृत्यू (राष्ट्रीय महामार्ग) : अपघात (राज्य महामार्ग) : मृत्यू (राज्य महामार्ग)२०१९ : ८,३६० : ३,७९९ : ७,२१४ : ३,३४४२०२० : ६,५०१ : ३,५२८ :५,५१८ : २,९७१२०२१ : ७,५०१ : ४,०८० : ६,३२८ : ३,४११२०२२ : ९,४१७ : ४,९२३ : ६,९०२ : ३,८२०२०२३ : १०,८५९ : ५,६८१ : ६,०४० : ३,१८१२०२४ ( फेब्रुवारीपर्यंत ) : १,८१८ : ९०० : ९८४ : ५१८

शहरनिहाय अपघात (जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४)शहर : अपघात : मृत्यूनागपूर : १,४२६ : ६८२पुणे : १,४७८ : ४१३मुंबई : २,८९२ : ४२६छ.संभाजीनगर : ७०८ : २३४

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर