शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

‘हायवे’मुळे नागपूर जिल्ह्यातील ८६ गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 07:30 IST

Nagpur News पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सहा महामार्गाचे जाळेमहामार्गांना जाेडणाऱ्या नवीन मार्गाची भर

 सुनील चरपे

नागपूर : सर्वांगीण विकासात रस्त्यांची अखंडता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. नागपूर जिल्ह्यातून सहा वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

नागपूर जिल्ह्यातून काेलकाता (पश्चिम बंगाल)- सुरत (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (एशियन महामार्ग क्रमांक-४६), कन्याकुमारी (तामिळनाडू)-वाराणसी (उत्तर प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७, नागपूर-बैतूल (मध्य प्रदेश)-जामनगर (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४७, नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश)-नरसिंगपूर (मध्य प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७, नागपूर-वर्धा-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ आणि नागपूर-गडचिराेली-वारंगल (तेलंगणा) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ (सी) असे सहा राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ (सी) वगळता अन्य पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणारा नवीन राष्ट्रीय मार्ग तयार केला आत असून, त्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहेत. हे सर्व महामार्ग चाैपदरी असून, त्यावरून २४ तास वाहनांची वर्दळ असल्याने या महामार्गालगतच्या गावांमध्ये विविध उद्याेगधंद्यांना चांगले दिवस आले आहेत. या महामार्गालगत हाॅटेल्स, ढाबे, पानटपरीसह इतर धंद्यांची भरभराट हाेत असल्याचेही दिसून आले आहे.

चाैपदरी रस्ते

नागपूर-काेंढाळी - ५० किमी

नागपूर-माैदा - ३० किमी

नागपूर-देवलापार - ६५ किमी

नागपूर-बुटीबाेरी - २२ किमी

नागपूर-सावनेर - ३५ किमी

नागपूर-केळवद - ४५ किमी

नागपूर-उमरेड - ५४ किमी

या तालुक्यांना लाभ

राष्ट्रीय महामार्गांमुळे नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक लाभ नागपूर (ग्रामीण), कामठी, सावनेर व हिंगणा तालुक्यातील गावांना झाला आहे. त्याखालाेखाल लाभ माैदा, कळमेश्वर, हिंगणा, उमरेड, रामटेक व काटाेल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावांना झाला आहे. जिल्ह्यातील नरखेड, कुही व पारशिवनी तालुक्यात महामार्ग नाही.

नवीन महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातून गेलेल्या सहापैकी पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील काही अंतर्गत गावे या या महामार्गालगत आल्याने त्या गावांमध्ये उद्याेगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्माण हाेत आहे.

प्रवासाचे अंतर व वेळ कमी

या राष्ट्रीय महामार्गांमुळे प्रवासाचे अंतर व वेळ कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया काही आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह इतर राज्यांमध्ये फळे व भाजीपाला विकायला नेणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महामार्गावर २४ तास रहदारी असल्याने उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती या महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्ग