शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘हायवे’मुळे नागपूर जिल्ह्यातील ८६ गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 07:30 IST

Nagpur News पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सहा महामार्गाचे जाळेमहामार्गांना जाेडणाऱ्या नवीन मार्गाची भर

 सुनील चरपे

नागपूर : सर्वांगीण विकासात रस्त्यांची अखंडता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. नागपूर जिल्ह्यातून सहा वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

नागपूर जिल्ह्यातून काेलकाता (पश्चिम बंगाल)- सुरत (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (एशियन महामार्ग क्रमांक-४६), कन्याकुमारी (तामिळनाडू)-वाराणसी (उत्तर प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७, नागपूर-बैतूल (मध्य प्रदेश)-जामनगर (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४७, नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश)-नरसिंगपूर (मध्य प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७, नागपूर-वर्धा-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ आणि नागपूर-गडचिराेली-वारंगल (तेलंगणा) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ (सी) असे सहा राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ (सी) वगळता अन्य पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणारा नवीन राष्ट्रीय मार्ग तयार केला आत असून, त्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहेत. हे सर्व महामार्ग चाैपदरी असून, त्यावरून २४ तास वाहनांची वर्दळ असल्याने या महामार्गालगतच्या गावांमध्ये विविध उद्याेगधंद्यांना चांगले दिवस आले आहेत. या महामार्गालगत हाॅटेल्स, ढाबे, पानटपरीसह इतर धंद्यांची भरभराट हाेत असल्याचेही दिसून आले आहे.

चाैपदरी रस्ते

नागपूर-काेंढाळी - ५० किमी

नागपूर-माैदा - ३० किमी

नागपूर-देवलापार - ६५ किमी

नागपूर-बुटीबाेरी - २२ किमी

नागपूर-सावनेर - ३५ किमी

नागपूर-केळवद - ४५ किमी

नागपूर-उमरेड - ५४ किमी

या तालुक्यांना लाभ

राष्ट्रीय महामार्गांमुळे नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक लाभ नागपूर (ग्रामीण), कामठी, सावनेर व हिंगणा तालुक्यातील गावांना झाला आहे. त्याखालाेखाल लाभ माैदा, कळमेश्वर, हिंगणा, उमरेड, रामटेक व काटाेल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावांना झाला आहे. जिल्ह्यातील नरखेड, कुही व पारशिवनी तालुक्यात महामार्ग नाही.

नवीन महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातून गेलेल्या सहापैकी पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील काही अंतर्गत गावे या या महामार्गालगत आल्याने त्या गावांमध्ये उद्याेगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्माण हाेत आहे.

प्रवासाचे अंतर व वेळ कमी

या राष्ट्रीय महामार्गांमुळे प्रवासाचे अंतर व वेळ कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया काही आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह इतर राज्यांमध्ये फळे व भाजीपाला विकायला नेणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महामार्गावर २४ तास रहदारी असल्याने उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती या महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्ग